शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

केंद्रीय कर्मचाऱ्याची नागपूरच्या जिल्हा न्यायालयासमोर हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:48 IST

सीजीओ कॉम्प्लेक्समधील एका कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची अज्ञात आरोपीने न्यायालयाच्या समोर हत्या केली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री ९.३० वाजता ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देघातक शस्त्राचे घाव : मारेकरी अज्ञात : सीताबर्डीत गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतनागपूर : सीजीओ कॉम्प्लेक्समधील एका कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याची अज्ञात आरोपीने न्यायालयाच्या समोर हत्या केली. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या रात्री ९.३० वाजता ही थरारक घटना घडली. प्रेमलाल मोहनलाल देसाई (वय ५०) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते सुरेंद्रगड, सेमिनरी हिल्स भागात राहत होते.देसाई हे भारतीय मानव विज्ञान सर्व्हेक्षण विभागात कार्यरत होते. ते तीन वर्षांपासून कार्यालयात रात्रपाळी करीत होते. दुपारी ४ ते ४.३० वाजता ते घराबाहेर पडायचे. मित्राच्या पानटपरीवर गप्पागोष्टी केल्यानंतर सायंकाळी ते ग्रंथालयात येऊन पेपर वाचायचे. तेथून दैनंदिन वापराचे साहित्य घेतल्यानंतर ते घरी जायचे आणि नंतर आपल्या कर्तव्यावर रात्री १० ते १०.३० वाजता रुजू व्हायचे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री ते ग्रंथालयातून सायकलने आपल्या सेमिनरी हिल्स भागातील घराकडे निघाले होते. ९.३० वाजता आकाशवाणी चौक ओलांडताच हल्लेखोराने देसाई यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. सायकलवरून खाली पडल्यानंतर ते जीवाच्या धाकाने ‘वाचवा वाचवा म्हणत’ जिल्हा न्यायालयाच्या सुयोग इमारतीत शिरले. त्यांचा आवाज ऐकून आतमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी धावले तेव्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पायरीवर त्यांना देसाई रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसले. त्यांच्या पाठ आणि हातावरील घावातून मोठा रक्तस्राव होत होता. पोलीस कर्मचारी समीर दिलीपराव वाघ (वय ३१, प्रभातनगर, नरसाळा) यांनी नियंत्रण कक्ष तसेच सीताबर्डी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार हेमंत खराबे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावले. पोलिसांनी देसाई यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना पहाटे २ च्या सुमारास मृत घोषित केले.परिसरात अंधारमावळत्या वर्षाच्या सकाळी सक्करदऱ्यात आणि रात्री सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत त्यातल्या त्यात न्यायालयासमोर हत्येची घटना घडल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी चौकातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून देसाई यांची हत्या करणारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरात अंधार असल्यामुळे मारेकऱ्याचे चित्र किंवा तो कशावर, कुणासोबत होता, कुठून आला, कुठे पळाला त्याबाबत कसलीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.हत्येचे कारण अंधारातदेसाई यांच्या कुटुंबात पत्नी, दोन तरुण मुले आणि दोन मुली आहेत. ते शांत स्वभावाचे होते. कुणासोबत त्यांचा वाद नव्हता. त्यामुळे त्यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणासाठी केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जेव्हा मारेकऱ्यांनी देसाई यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या खिशात पाच ते सात हजार रुपये होते. ती रक्कमही देसाई यांच्याकडे जशीच्या तशीच होती. मोबाईलही होता. मारेकऱ्याने रक्कम, मोबाईलला हात लावला नाही. त्यामुळे देसाई यांची हत्या कोणत्या कारणामुळे झाली, ते कळायला मार्ग नाही.

 

टॅग्स :nagpurनागपूरMurderखून