शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

केंद्रीय अर्थसंकल्प आभासी अन् संदिग्ध

By admin | Updated: March 9, 2016 03:22 IST

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास, संरक्षण,

अतुल लोंढे : विकासाची दिशा दाखविण्यात कमीनागपूर : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास, संरक्षण, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांसाठी तरतुदी करण्यात आल्या. मात्र, यासाठी निधी कुठून येणार व नेमका कशावर खर्च होणार याची संदिग्धता कायम आहे. एकूणच अर्थसंकल्प विकासाची दिशा दाखविण्यात कमी पडला असून फक्त आभासी आहे, असे मत अर्थतज्ज्ञ व राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले. शिवाजी फाऊंडेशन व धनवटे नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने चिटणवीस सेंटर येथे अर्थतज्ज्ञ अतुल लोंढे यांचे अर्थसंकल्पीय विश्लेषण आयोजित करण्यात आले.अध्यक्षस्थानी मी शिवाजी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संजीव चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. सुनील केदार, माजी मंत्री रमेश बंग, डॉ. बबनराव तायवाडे, माजी आ. दीनानाथ पडोळे उपस्थित होते. या वेळी अतुल लोंढे म्हणाले,अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात ३५ हजार ९४० कोटी रुपयांची गुंतवणूक करून २०२२ पर्यंत कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. मात्र, उत्पन्न दुप्पट कसे करणार याची दिशा सांगितलेली नाही. मोठ्या शेतकऱ्यांच्या अनुदानात कपात करून लहान शेतकऱ्यांना अधिक फायदा द्यायला हवा होता. पण तसेही केलेले नाही. प्रत्येक ग्राम पंचायतीला ८० लाख रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, हा पैसे कुठून येणार, कशावर खर्च होणार हे स्पष्ट नाही. संरक्षण क्षेत्रात संशोधनापेक्षा महसुली खर्चच जास्त होणार आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रात उत्पदनाला चालना कशी मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तान, चीन हे बेभरवशाचे शेजारी असताना आपल्याला याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्व सेवांवर सेवाकर लावण्यात आला आहे. काही अत्यावश्यक सेवांना यातून सूट हवी होती. कर भरणाच्या पद्धतीतही अपेक्षित सुधारणा केलेली नाही. काळा पैसा परत आणू शकत नाही हे सरकारला कळून चुकले आहे. त्यामुळेच आता दंडासह ३७ टक्के कर भरून काळा पैसा नियमित करण्याची योजना आणली आहे. विशेष म्हणजे कुठल्याही शिक्षेची तरतूद केलेली नाही. काळा पैसा जमविणाऱ्यांना अशी सूट देणे म्हणजे सामान्य माणसावर अन्यायच आहे. कच्च्या तेलाचे भाव खाली आले असतानाही पेट्रोल, डिझेलचे भाव तेवढे कमी झालेले नाहीत. यातून सरकारला १ लाख ८० हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सरकाने याचा फायदा सामान्य ग्राहकाला देणे अपेक्षित होते. मात्र, ग्राहकांचाही हक्क हिरावण्यात आला असल्याचे लोंढे यांनी सांगितले. संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी यांनी केले. डॉ. अतुल नेरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)