शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पांढऱ्या डागावर पेशीरोपण : दीप्ती घिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:18 IST

आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईट’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग म्हणजे ‘कोड’ पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही. यावर पेशी रोपण ही प्रक्रियाही महत्त्वाचे ठरते, अशी माहिती मुंबई येथील त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती घिया यांनी दिली.

ठळक मुद्देडागाला मूळ त्वचेसारखा रंग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहात नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईट’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग म्हणजे ‘कोड’ पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही. यावर पेशी रोपण ही प्रक्रियाही महत्त्वाचे ठरते, अशी माहिती मुंबई येथील त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. दीप्ती घिया यांनी दिली.‘क्युटीकॉन-२०१८’मध्ये सहभागी झाले असताना त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. डॉ. घिया म्हणाल्या, पेशीरोपणमध्ये रुग्णाच्याच शरीरावरील त्वचेचा थोडासा तुकडा काढून घेतला जातो. त्यावर प्रक्रिया करून त्यातील रंगपेशी वेगळ्या काढल्या जातात. या पेशींमध्ये काही विशिष्ट घटक मिसळून त्याचे द्रावण तयार केले जाते आणि ते डाग आलेल्या त्वचेत सोडले जाते. पेशीरोपण शरीराच्या कोणत्याही भागात करता येते. डागांमध्ये रंगपेशी सोडल्यानंतर त्या आपले रंग तयार करण्याचे काम करू लागतात, आणि डागाला मूळ त्वचेसारखा रंग येऊ लागतो.‘फंगल इन्फेक्शन’ वाढतेय -डॉ. शेनॉय 

कर्नाटक येथील त्वचारोग तज्ज्ञ मंजुनाथ शेनॉय म्हणाले, पूर्वी ‘फंगल इन्फेक्शन’ (बुरशीजन्य संसर्ग) आजार साधारण दोन महिन्यात बरा व्हायचा परंतु आता वर्ष लागते. या आजारात ‘म्युटेशन’ (उत्परीवर्तन) झाले आहे. परिणामी, पूर्वी शरीराच्या एक-दोन ठिकाणी या आजाराचा ‘पॅच’ दिसून यायचा. अलीकडे संपूर्ण शरीरावर हा आजार दिसून येतो. ‘ग्लोबल वार्मिंग’, वाढते प्रदूषण, घट्ट असणारे कपडे, एकच जिन्स दहा-दहा दिवस घालणे आदींमुळे हा आजार वाढतोय. यात स्वत:हून औषधोपचार करणे धोकादायक ठरत आहे. कारण, यातील बहुसंख्य क्रिम्समध्ये ‘स्ट्राँग स्टेरॉईड्स’ राहात असल्याने हा आजार आणखी गंभीर होत आहे, या आजरावर मोजून चार औषधी आहेत. यातील केवळ एकच औषध प्रभावी ठरत असून इतर तीन औषधांना हा आजार जुमानत नसल्याचे किंवा त्याचा प्रभाव कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच या आजाराची डॉक्टरांमध्ये व रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ तयार केले आहे.डॉ. बालचंद्र अंकद म्हणाले, पूर्वी त्वचारोगाचे निदान करण्यासाठी अर्धा सेंटीमीटर त्वचा काढून प्रयोगशाळेत तपासणी करावी लागायची. परंतु आता ‘डर्माेस्कोपी’मुळे ‘ओपीडी’मध्येच रुग्णाच्या त्वचारोगाचे निदान होणे शक्य झाले आहे. 
त्वचेवरील ‘सोरायसीस’, काळ्या डागाचे ‘मेलॅनिन’, ‘फंगल इन्फेक्शन’ याचे तातडीने निदान होते. विशेष म्हणजे, केसगळती कोणत्या प्रकारातील आहे, याची माहिती या उपकरणाच्या मदतीने मिळू शकते. परिणामी, त्या प्रकाराचे औषधोपचार केल्यास ते प्रभावी ठरतात. त्वचेवरील कॅन्सरच्या निदानामध्येही याचा उपयोग होतो.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर