शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

‘सीसीआय’ची खुल्या बाजारात कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 08:00 IST

Nagpur News सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) ने सन २०२० नंतर चालू हंगामात (सन २०२२-२३) कापूस खरेदीचा निर्णय घेत गुरुवारी (दि. १५) देशाभरात चार खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देदेशात चार खरेदी केंद्र सुरू

सुनील चरपेनागपूर : सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) ने सन २०२० नंतर चालू हंगामात (सन २०२२-२३) कापूस खरेदीचा निर्णय घेत गुरुवारी (दि. १५) देशाभरात चार खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशात प्रत्येकी दाेन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खरेदी केंद्र वाढणार असून, या केंद्रांवर खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदी केली जाणार असल्याचे सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सीसीआयने गुरुवारी महाराष्ट्रातील गेवराई (जिल्हा बीड) व बदनापूर (जिल्हा जालना) आणि ओडिशातील रायगडा जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. या केंद्रावर कापसाची नियमित आवक आणि दर्जावर विशेष भर देत बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदी केली जाणार आहे. गरजेनुसार खरेदी केंद्र वाढविले जाईल, असेही सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीसीआयने गेवराई व बदनापूर येथील खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल ८,४०० रुपये दराने कापसाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. या केंद्रावर पहिल्या दिवशी कापसाची आवक कमी हाेती, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. सीसीआयची कापूस खरेदी ही बाजार समितीच्या प्रति शेकडा शुल्क आकारणीवर अवलंबून असेल.

तर दर काेसळतीलजागतिक बाजारात गुरुवारी रुईचे दर ९९.४ सेंट प्रति पाउंडपर्यंत खाली आले. देशांतर्गत बाजारात सरकीचे दर कमी झाल्याने कापसाचे दर ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलने उतरले आहे. सीसीआयने जर कमी दरात कापूस खरेदी केला आणि आपण किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दराने कापूस खरेदी करीत आहाेत, असा तर्क दिला तर कापसाचे दर काेसळतील.

तर दर वधारतील

मागील वर्षी कापसाच्या ४६ लाख गाठींची निर्यात केली होती. तेवढीच निर्यात यावर्षीही करण्याची घोषणा केंद्र सरकारने सीसीआयच्या माध्यमातून करावी. कापूस निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने सीसीआयला सबसिडी जाहीर करावी. त्यामुळे कापसाचा शिल्लक साठा कमी हाेईल. यातून व्यापाऱ्यांना कापसाचे दर पाडणे शक्य हाेणार नाही.

शेतकऱ्यांना अधिकाधिक दर मिळावा, यासाठी सीसीआय प्रयत्नशील आहे. सध्या दाेन केंद्र सुरू केले आहेत. आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.- अर्जुन दवे, उपमहाप्रबंधक,

सीसीआय, औरंगाबाद.

 

शेतकऱ्यांना ९ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दरात कापूस विकणे परवडत नाही. सीसीआयने सी-टू अधिक ५० टक्के नफा या दराने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करावी. तशी केंद्र सरकारने घाेषणा करावी.- विजय जावंधिया, 

शेतकरी संघटना. 

सीसीआय बाजारात उतरल्याने शेतकऱ्यांना फायदा हाेईल. स्पर्धेमुळे कापसाच्या दरात वाढ हाेऊ शकते. सीसीआयने स्पर्धेत उतरून कापसाची खरेदी करावी.- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक,

कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र.

टॅग्स :cottonकापूस