शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

‘सीसीआय’ची खुल्या बाजारात कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2022 08:00 IST

Nagpur News सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) ने सन २०२० नंतर चालू हंगामात (सन २०२२-२३) कापूस खरेदीचा निर्णय घेत गुरुवारी (दि. १५) देशाभरात चार खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देदेशात चार खरेदी केंद्र सुरू

सुनील चरपेनागपूर : सीसीआय (काॅटन कार्पाेरेशन ऑफ इंडिया) ने सन २०२० नंतर चालू हंगामात (सन २०२२-२३) कापूस खरेदीचा निर्णय घेत गुरुवारी (दि. १५) देशाभरात चार खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशात प्रत्येकी दाेन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खरेदी केंद्र वाढणार असून, या केंद्रांवर खुल्या बाजारातील दरानुसार कापूस खरेदी केली जाणार असल्याचे सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सीसीआयने गुरुवारी महाराष्ट्रातील गेवराई (जिल्हा बीड) व बदनापूर (जिल्हा जालना) आणि ओडिशातील रायगडा जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. या केंद्रावर कापसाची नियमित आवक आणि दर्जावर विशेष भर देत बाजारभावाप्रमाणे कापूस खरेदी केली जाणार आहे. गरजेनुसार खरेदी केंद्र वाढविले जाईल, असेही सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीसीआयने गेवराई व बदनापूर येथील खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल ८,४०० रुपये दराने कापसाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. या केंद्रावर पहिल्या दिवशी कापसाची आवक कमी हाेती, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. सीसीआयची कापूस खरेदी ही बाजार समितीच्या प्रति शेकडा शुल्क आकारणीवर अवलंबून असेल.

तर दर काेसळतीलजागतिक बाजारात गुरुवारी रुईचे दर ९९.४ सेंट प्रति पाउंडपर्यंत खाली आले. देशांतर्गत बाजारात सरकीचे दर कमी झाल्याने कापसाचे दर ४०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलने उतरले आहे. सीसीआयने जर कमी दरात कापूस खरेदी केला आणि आपण किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक दराने कापूस खरेदी करीत आहाेत, असा तर्क दिला तर कापसाचे दर काेसळतील.

तर दर वधारतील

मागील वर्षी कापसाच्या ४६ लाख गाठींची निर्यात केली होती. तेवढीच निर्यात यावर्षीही करण्याची घोषणा केंद्र सरकारने सीसीआयच्या माध्यमातून करावी. कापूस निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने सीसीआयला सबसिडी जाहीर करावी. त्यामुळे कापसाचा शिल्लक साठा कमी हाेईल. यातून व्यापाऱ्यांना कापसाचे दर पाडणे शक्य हाेणार नाही.

शेतकऱ्यांना अधिकाधिक दर मिळावा, यासाठी सीसीआय प्रयत्नशील आहे. सध्या दाेन केंद्र सुरू केले आहेत. आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.- अर्जुन दवे, उपमहाप्रबंधक,

सीसीआय, औरंगाबाद.

 

शेतकऱ्यांना ९ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी दरात कापूस विकणे परवडत नाही. सीसीआयने सी-टू अधिक ५० टक्के नफा या दराने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करावी. तशी केंद्र सरकारने घाेषणा करावी.- विजय जावंधिया, 

शेतकरी संघटना. 

सीसीआय बाजारात उतरल्याने शेतकऱ्यांना फायदा हाेईल. स्पर्धेमुळे कापसाच्या दरात वाढ हाेऊ शकते. सीसीआयने स्पर्धेत उतरून कापसाची खरेदी करावी.- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक,

कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र.

टॅग्स :cottonकापूस