शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दोषारोप निश्चित झालेला खटलाही होऊ शकतो रद्द - नागपूर खंडपीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 06:28 IST

न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आणि न्यायदानाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता दोषारोप निश्चित झालेला खटलाही रद्द केला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे.

- राकेश घानोडेनागपूर : न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आणि न्यायदानाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता दोषारोप निश्चित झालेला खटलाही रद्द केला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे.उच्च न्यायालय न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग होऊ नये याकरिता प्रकरणातील तथ्यांच्या आधारावर आवश्यक तो निर्णय देऊ शकते. परंतु, हा अधिकार दोषारोप निश्चित झालेला खटला रद्द करण्यासाठी वापरता येणार नाही, असा आक्षेप राज्य सरकारने घेतला होता. उच्च न्यायालयाने तो खोडून काढला. दोषारोप निश्चित झालेला खटला रद्द करता येणार नाही असे बंधन नसल्याचे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.न्यायमूर्ती रवी देशपांडे व विनय जोशी यांनी सक्करदरा येथील विनयभंगाच्या प्रकरणामध्ये नुकताच हा निर्णय दिला. या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित केले होते. त्यानंतर आरोपी आशिष अशोक ढबाले व फिर्यादी मुलीने सहमतीने वाद मिटविला. ढबालेने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यात मुलीने प्रतिज्ञापत्र दाखल करून विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने कायदेशीर परिस्थिती लक्षात घेता अर्ज मंजूर केला. हे मृत प्रकरण कायम ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.असे आहे प्रकरणभांडणात आरोपीने फिर्यादी मुलीचा हात पकडून तिला बळजबरीने जवळ ओढले. मुलीच्या फिर्यादीवरून सक्करदरा पोलिसांनी विनयभंग, मारहाणप्रकरणी तपास करून जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर