शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

‘बीकॉम’ चे प्रकरण तज्ज्ञ समितीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:40 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाने घेतला निर्णय : विद्यार्थ्यांनी केला कुलगुरुंना घेराव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने बी.कॉम अंतिम वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे आल्याचे प्रकरण विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या निर्णयानंतरच विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाचे गुण द्यायचे की पुन्हा परीक्षा घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.बी.कॉम. च्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर शुक्रवारी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत आलेल्या चुकीच्या प्रश्नांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कुलगुरूंनी संबंधित निर्णय घेतला. बीकॉम अंतिम वर्षाच्या फायनान्शियल अकाऊंटिंग- ३ या विषयाच्या तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले होते. पेपर सेटरने एका गाईडमधून प्रश्न चोरी केले असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. ही चोरी लपविण्यासाठी प्रश्नातील आकड्यांमध्ये हेराफेरी करण्यात आल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला होता. प्रश्न क्रमांक २ (सी) व प्रश्न क्रमांक ३ (सी) मध्येही घोळ होता.या संबंधी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. लवकरच हे प्रकरण विषय तज्ज्ञ समितीकडे पाठविले जाईल. समितीच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल.अधिकारीही मानत आहे चूक परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्नपत्रिका पाहून त्यातील तीन प्रश्नात चुका असल्याचे मान्य केले. आकड्यांची हेराफेरी करण्यात ही चूक झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिकेला अंतिम रुप देताना आकड्यांचा ताळमेळ साधण्यात आलेला नाही, असेही यावरून दिसते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी