शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफीचा शासन निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:05 IST

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप करत, या संदर्भातील २७ डिसेंबर २०१९ रोजी काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.

ठळक मुद्देअ.भा. ग्राहक पंचायत : कर्जमाफीची योजना फसवी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप करत, या संदर्भातील २७ डिसेंबर २०१९ रोजी काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.२७ डिसेंबरच्या परिपत्रकानुसार दोन लाखाहून एक हजार रुपये जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू होणार नाही. सरकारने कर्जमाफी द्यायचीच असेल तर ही तरतूद काढून नव्या तरतुदीसह परिपत्रक काढावे व कुठलीही अट न टाकता कमीत कमी दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करावी, असे आवाहन पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केले आहे. यासोबतच, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह एकत्रित थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास, त्यांनाही या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी पंचायतचे संजय धर्माधिकारी, डॉ.नारायण मेहेरे, डॉ.अजय गाडे, सुधीर मिसार, संध्या पुनियानी, तृप्ती आकांत यांच्यासह अन्य सदस्यांनी केली आहे.नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काय? ३० टक्के शेतकरी नियमित कर्ज फेडतात. परंतु, त्यांचा विचार केला जात नाही, ही खंत व्यक्त करत पंचायतने मागील सरकारच्या कर्जमाफीचे गोडवेही गायले आहे. मागील सरकारने जून २०१५मध्ये शेतकऱ्यांकरिता दीड लाख रुपये सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र, दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या ५० टक्के शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ झाला होता. त्याच धर्तीवर याही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, अशी मागणी गजानन पांडे यांनी केली आहे. केवळ २० टक्के शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असला तरी ३१ मार्च २०२० नंतरच अंमलबजावणी होणार असल्याचे, हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार