शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफीचा शासन निर्णय रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 23:05 IST

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप करत, या संदर्भातील २७ डिसेंबर २०१९ रोजी काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.

ठळक मुद्देअ.भा. ग्राहक पंचायत : कर्जमाफीची योजना फसवी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असल्याचा आरोप करत, या संदर्भातील २७ डिसेंबर २०१९ रोजी काढलेले शासन परिपत्रक रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली आहे.२७ डिसेंबरच्या परिपत्रकानुसार दोन लाखाहून एक हजार रुपये जास्त कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना लागू होणार नाही. सरकारने कर्जमाफी द्यायचीच असेल तर ही तरतूद काढून नव्या तरतुदीसह परिपत्रक काढावे व कुठलीही अट न टाकता कमीत कमी दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करावी, असे आवाहन पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी केले आहे. यासोबतच, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान सोसाव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित कर्ज खात्यांची मुद्दल व व्याजासह एकत्रित थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत असल्यास, त्यांनाही या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी पंचायतचे संजय धर्माधिकारी, डॉ.नारायण मेहेरे, डॉ.अजय गाडे, सुधीर मिसार, संध्या पुनियानी, तृप्ती आकांत यांच्यासह अन्य सदस्यांनी केली आहे.नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काय? ३० टक्के शेतकरी नियमित कर्ज फेडतात. परंतु, त्यांचा विचार केला जात नाही, ही खंत व्यक्त करत पंचायतने मागील सरकारच्या कर्जमाफीचे गोडवेही गायले आहे. मागील सरकारने जून २०१५मध्ये शेतकऱ्यांकरिता दीड लाख रुपये सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र, दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या ५० टक्के शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ झाला होता. त्याच धर्तीवर याही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा, अशी मागणी गजानन पांडे यांनी केली आहे. केवळ २० टक्के शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ होणार असला तरी ३१ मार्च २०२० नंतरच अंमलबजावणी होणार असल्याचे, हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार