शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:52 IST

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूरजवळील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात व सिंचनात झालेल्या घटीमुळे व पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना राज्याच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून सिंचनाचे धडक कार्यक्रम यामुळे राबविणे सोईचे होणार आहे.

ठळक मुद्देचौराईमुळे पेंचच्या पाण्यात झाली घट : धडक सिंचन कार्यक्रम राबवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूरजवळील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात व सिंचनात झालेल्या घटीमुळे व पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना राज्याच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून सिंचनाचे धडक कार्यक्रम यामुळे राबविणे सोईचे होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी या उपाययोजनांना मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागपूर-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळणार आहे.चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ६१५ दशलक्ष मीटर पाणी कमी झाले आहे. चौराई धरण होईपर्यंत २८ वर्षांपासून तोतलाडोह येथे उपलब्ध होणारे सर्व पाणी वापरण्यात येत होते. पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. ६१५ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट भरून काढण्यासाठी, सिंचनासंदर्भात उद्भवलेल्या गंभीर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कमी कालावधीत व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पालकमंत्री बावनकुळे यांनी जलसंपदा विभाग, कृषी विभाग, मनपा, एनटीपीस, वेस्टर्न कोल फिल्डस, महानिर्मिती यांच्यामार्फत होणाऱ्या  व्यवसायांचे प्रस्ताव मागविले होते. जलसंपदा विभागामार्फत शासनाच्या अखत्यारीतील व कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या  प्रस्तावीत तीन उपाययोजनांच्या माध्यमातून २६,३७० हेक्टर क्षेत्र पेंच नदीतून चौराई धरणामुळे उद्भवलेल्या ६१५ दशलक्ष घनमीटर पाणी तुटीमुळे अडचणीत आलेले सिंचनक्षेत्र हे कन्हान नदी, वैनगंगा नदी, नागनदी, व लाभक्षेत्रात उपलब्ध व प्राप्त होणाऱ्या  पाण्यापासून पुनर्स्थापित करण्यासाठी १०१५ कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर