शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:52 IST

मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूरजवळील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात व सिंचनात झालेल्या घटीमुळे व पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना राज्याच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून सिंचनाचे धडक कार्यक्रम यामुळे राबविणे सोईचे होणार आहे.

ठळक मुद्देचौराईमुळे पेंचच्या पाण्यात झाली घट : धडक सिंचन कार्यक्रम राबवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे नागपूरजवळील पेंच प्रकल्पाच्या पाणी साठ्यात व सिंचनात झालेल्या घटीमुळे व पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना राज्याच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी मान्यता दिली. जलसंपदा विभागाच्या १०१५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून सिंचनाचे धडक कार्यक्रम यामुळे राबविणे सोईचे होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी या उपाययोजनांना मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे नागपूर-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळणार आहे.चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ६१५ दशलक्ष मीटर पाणी कमी झाले आहे. चौराई धरण होईपर्यंत २८ वर्षांपासून तोतलाडोह येथे उपलब्ध होणारे सर्व पाणी वापरण्यात येत होते. पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. ६१५ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट भरून काढण्यासाठी, सिंचनासंदर्भात उद्भवलेल्या गंभीर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कमी कालावधीत व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पालकमंत्री बावनकुळे यांनी जलसंपदा विभाग, कृषी विभाग, मनपा, एनटीपीस, वेस्टर्न कोल फिल्डस, महानिर्मिती यांच्यामार्फत होणाऱ्या  व्यवसायांचे प्रस्ताव मागविले होते. जलसंपदा विभागामार्फत शासनाच्या अखत्यारीतील व कमी कालावधीत पूर्ण होणाऱ्या  प्रस्तावीत तीन उपाययोजनांच्या माध्यमातून २६,३७० हेक्टर क्षेत्र पेंच नदीतून चौराई धरणामुळे उद्भवलेल्या ६१५ दशलक्ष घनमीटर पाणी तुटीमुळे अडचणीत आलेले सिंचनक्षेत्र हे कन्हान नदी, वैनगंगा नदी, नागनदी, व लाभक्षेत्रात उपलब्ध व प्राप्त होणाऱ्या  पाण्यापासून पुनर्स्थापित करण्यासाठी १०१५ कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर