शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

CAA : विरोध करण्यापूर्वी कायदा समजून घ्या :  दयाशंकर तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:36 PM

भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा हा देशातील कुठल्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. विरोध करणाऱ्यांनी विरोधापूर्वी कायदा समजावून घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.

ठळक मुद्देदेशातील कुठल्याही धर्म, जातीच्या नागरिकांच्या विरोधात कायदा नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय नागरिकत्व संशोधन कायदा हा देशातील कुठल्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. जे शरणार्थी भारतात वास्तव्य करीत आहे. त्यांना संरक्षण देणारा कायदा आहे. सरकारने अमलात आणत असलेले सर्व कायदे काँग्रेस सरकारच्या काळात बनले आहे. फक्त भाजप सरकार त्याची अंमलबजावणी करीत असल्यामुळे विरोधी पक्ष कुटील राजकारण करून विशिष्ट धर्माला भडकवत आहे. विरोध करणाऱ्यांनी विरोधापूर्वी कायदा समजावून घ्यावा, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले.

लोकजनशक्ती मोर्चाच्यावतीने सीएए च्या समर्थनात शनिवारी सक्करदरा चौकात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला मुख्य वक्ता म्हणून दयाशंकर तिवारी उपस्थित होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, शुद्धचित्त बुद्ध विहारचे भंते रावजी पिंडक, शीख संप्रदायाचे चरणजितसिंग रेणू, नगरसेवक अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, अ‍ॅड. नरेंद्र गोंडाने, लोकजागृती मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. रमण सेनाड, अशोक गोयल, देवेंद्र दस्तूरे, सुभाष कोटेचा आदी उपस्थित होते. सीएएच्या समर्थनात पोस्टकार्ड अभियान राबविण्यात आले. सभेला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी पोस्ट कार्डवर सीएएचे समर्थन करून बॉक्समध्ये टाकले. हे पोस्टकार्ड मुख्य न्यायाधीशांना पाठविण्यात येणार असल्याचे सेनाड म्हणाले.याप्रसंगी दयाशंकर तिवारी यांनी सीएए कायद्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले १९५५ ला नागरिकता संशोधन कायदा करण्यात आला. वेळोवेळी त्यात बदलही करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी या कायद्यात कुठलेच बदल केले नाही. या कायद्याच्या कलम ५ मध्ये फेरबदल केले. कलम ५ मध्ये पूर्वी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व हवे असेल तर येथे ११ वर्षाचा अधिवास ग्राह्य धरावा लागत होता. आता तो फक्त ५ वर्षाचा केला आहे. पण हे मोदींनी केल्यामुळे त्याला विरोध होत असल्याचे तिवारी म्हणाले. यावेळी त्यांनी सीएए, एनआरसी, एनपीआर का आले. त्याला कुणी समर्थन दिले. ती काळाजी गरज कशी आहे. यावर मार्गदर्शन केले. प्रसंगी अ‍ॅड. नरेंद्र गोंडाने यांनी सीएए ला समर्थन देत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुस्लिमांना अद्याप भारत समजलेला नसल्याचे मत अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमण सेनाड यांनी तर संचालन अभिजित मुळे यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपा