शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

एकाही मुस्लिमावर ‘सीएए’मुळे अन्याय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 10:48 IST

काँग्रेसने तर मुस्लिमांना केवळ ‘व्होट मशीन’प्रमाणेच वापरले आहे, या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्यापासून कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून व्होट बँकेसाठी मुस्लिमांची दिशाभूल, सीएए समर्थनार्थ भव्य रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यामुळे देशातील मुस्लिम बांधवांना कुठलाही त्रास होणार नाही. या कायद्यामुळे मुस्लिमांना कुठलाही धोका नाही. परंतु काँग्रेस व इतर तत्त्व मुस्लिमांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करीत आहेत. काँग्रेसने तर मुस्लिमांना केवळ ‘व्होट मशीन’प्रमाणेच वापरले आहे, या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या कायद्यापासून कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन केले. लोकाधिकार मंचतर्फे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समापनप्रसंगी संविधान चौक येथे ते बोलत होते.यशवंत स्टेडियम येथून सकाळी १० च्या सुरुवातीला या रॅलीची सुरुवात झाली. या रॅलीमध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटना तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक, अशी ही रॅली होती. रॅलीमध्ये हजारो लोक या कायद्याच्या समर्थनार्थ एकत्रित आले होते. विशेष म्हणजे रॅलीमध्ये माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील सहभागी झाले होते. रॅलीच्या समापनप्रसंगी गोविंददेवगिरी महाराज, अंजनगाव सुर्जी येथील श्रीदेवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज, खा. विकास महात्मे, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ.मोहन मते, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, माजी खासदार अजय संचेती, महापौर संदीप जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. आम्ही जातीय भेदाभेद मानत नाही. समाजातून अस्पृश्यता व जातीयवाद आम्हाला दूर करायचा आहे. राममंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याने ठेवली होती. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आजवर आपल्या देशाने जगाला सहिष्णूता शिकविली आहे. आम्हाला कुणी सहिष्णूता शिकवू नये. मतांच्या राजकारणातून नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे, हे हिंदूंना जातीवादी म्हणणाऱ्यांनी समजून घ्यायला हवे. नागरिकत्व कायदा हा भारतीय मुस्लिमांच्या विरोधात नाही. मुस्लिमांवर कधीही अत्याचार होऊ देणार नाही. कुणीही अपप्रचारात फसू नये, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.महात्मा गांधींच्या शब्दाची पूर्ततापाकिस्तान व बांगला देशमधील अल्पसंख्यकांना तेथे अन्यायग्रस्त वाटत असेल तर त्यांना भारत आधार देईल, असे खुद्द महात्मा गांधी म्हणाले होते. संविधानात बाबासाहेबांनी स्पष्ट केले की, बाहेरून येणारे हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई, पारशी हे शरणार्थी आहेत. मुस्लिम लोकांना १५० देशांचा विकल्प आहे व ते तेथे शरण घेऊ शकतात. संविधानानुसारच सरकार काम करीत आहे व यामुळे इतर देशांत अन्याय सहन करीत असलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई, पारशी नागरिकांना देशाचे नागरिकत्व मिळणार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

‘सीएए’ देशहिताचा कायदा : फडणवीसनागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशाच्या फायद्याचे आहे. यामुळे असंख्य हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ईसाई, पारशी यांना हक्काचे नागरिकत्व मिळणार आहे. या विधेयकाला लोकांचे समर्थन आहे, म्हणूनच सुटीचा दिवस असूनदेखील घरी न बसता लोक रस्त्यांवर आले आहेत. देशाच्या हितासाठी असलेला हा कायदा आहे. कुठलाही धर्म, समाजाच्या विरोधात हा कायदा नाही. काही राजकीय पक्ष लोकांना भडकवून त्यांची माथी फिरविण्याचे काम करीत आहेत. या माध्यमातून देशात अराजकता माजविण्याचे त्यांचे षङ्यंत्र आहे. परंतु देश या कायद्याच्या समर्थनार्थ आहे. सर्वांनी या कायद्यातील तरतुदी समजावून घ्याव्यात, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक