शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

२०५० पर्यंत प्रत्येक दुसऱ्या मुलाला चष्मा लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:19 IST

डॉ. पार्थ बिस्वास : 'स्क्रीन टाइम'वर मर्यादा घातली नाही तर धोका वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जर मुलांचा 'स्क्रीन टाइम' आताच आटोक्यात आणला नाही, तर २०५० पर्यंत प्रत्येक दुसऱ्या शालेय मुलाला चष्मा लावावा लागेल, असा गंभीर इशारा अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेचे (एआयओएस) अध्यक्ष डॉ. पार्थ बिस्वास यांनी दिला.

रविवारी आयोजित विदर्भऑप्थाल्मिक सोसायटीच्या (व्हीओएस) पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. व्ही. नरेंद्रन (अरविंद आय हॉस्पिटल, कोइम्बतूर) आणि डॉ. प्रशांत बावनकुळे (अध्यक्ष, एआरसी, एआयओएस) यांचीही विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. विरल शाह यांनी अध्यक्ष तर, डॉ. क्षमिक मोकादम यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

दर सहा महिन्यांनी बदलावा लागत आहे चष्मामायोपिया असलेल्या मुलांना दर सहा महिन्यांनी चष्मा बदलण्याची वेळ येत आहे. यामुळे त्यांचे खेळ, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यावर परिणाम होत आहे. 'एआयओएस'ने केंद्र सरकारकडे मोबाइल, टॅब आणि अन्य 'निअर व्हिजन डिव्हाइसेस'वरील वापरासाठी मार्गदर्शक नियम सुचवले आहेत. हे धोरण सरकारने लवकरात लवकर स्वीकारावे, म्हणजे अनेक मुलांचे डोळे वाचू शकतील.

जनजागृतीवर दिला जाणार भरडॉ. विरल शाह म्हणाले, मुलांमध्ये मायोपिया वाढू नये यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. विदर्भातील झपाट्याने बदलणाऱ्या ग्रामीण भागांतील आणि महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येईल.

२३ टक्के शालेय मुलांना मायोपियाडॉ. बिस्वास म्हणाले, कोविडनंतरच्या काळात मुलांमध्ये मायोपिया (दृष्टी कमी होणे, चषयाची गरज भासणे) झपाट्याने वाढत आहे. सध्या सुमारे २३ टक्के शालेय मुलांना मायोपिया आहे. ही संख्या २०५० पर्यंत ५३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्यeye care tipsडोळ्यांची निगा