शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०५० पर्यंत प्रत्येक दुसऱ्या मुलाला चष्मा लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:19 IST

डॉ. पार्थ बिस्वास : 'स्क्रीन टाइम'वर मर्यादा घातली नाही तर धोका वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जर मुलांचा 'स्क्रीन टाइम' आताच आटोक्यात आणला नाही, तर २०५० पर्यंत प्रत्येक दुसऱ्या शालेय मुलाला चष्मा लावावा लागेल, असा गंभीर इशारा अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेचे (एआयओएस) अध्यक्ष डॉ. पार्थ बिस्वास यांनी दिला.

रविवारी आयोजित विदर्भऑप्थाल्मिक सोसायटीच्या (व्हीओएस) पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. व्ही. नरेंद्रन (अरविंद आय हॉस्पिटल, कोइम्बतूर) आणि डॉ. प्रशांत बावनकुळे (अध्यक्ष, एआरसी, एआयओएस) यांचीही विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. विरल शाह यांनी अध्यक्ष तर, डॉ. क्षमिक मोकादम यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

दर सहा महिन्यांनी बदलावा लागत आहे चष्मामायोपिया असलेल्या मुलांना दर सहा महिन्यांनी चष्मा बदलण्याची वेळ येत आहे. यामुळे त्यांचे खेळ, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यावर परिणाम होत आहे. 'एआयओएस'ने केंद्र सरकारकडे मोबाइल, टॅब आणि अन्य 'निअर व्हिजन डिव्हाइसेस'वरील वापरासाठी मार्गदर्शक नियम सुचवले आहेत. हे धोरण सरकारने लवकरात लवकर स्वीकारावे, म्हणजे अनेक मुलांचे डोळे वाचू शकतील.

जनजागृतीवर दिला जाणार भरडॉ. विरल शाह म्हणाले, मुलांमध्ये मायोपिया वाढू नये यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. विदर्भातील झपाट्याने बदलणाऱ्या ग्रामीण भागांतील आणि महापालिकेच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येईल.

२३ टक्के शालेय मुलांना मायोपियाडॉ. बिस्वास म्हणाले, कोविडनंतरच्या काळात मुलांमध्ये मायोपिया (दृष्टी कमी होणे, चषयाची गरज भासणे) झपाट्याने वाढत आहे. सध्या सुमारे २३ टक्के शालेय मुलांना मायोपिया आहे. ही संख्या २०५० पर्यंत ५३ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्यeye care tipsडोळ्यांची निगा