शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर ग्रामीण भागासाठी दर अर्ध्या तासाला बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:49 IST

Buses for rural Nagpur कोरोनानंतर एसटी महामंडळाने मोजक्या फेऱ्या सुरू केल्या. परंतु यात ग्रामीण भागातील अत्यल्प फेऱ्यांचा समावेश असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून ग्रामीण भागातही दर अर्ध्या तासाला फेऱ्या सुरू करण्याची तयारी महामंडळाने केली आहे.

ठळक मुद्देएसटीचे नियोजन : ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सुविधा

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनानंतर एसटी महामंडळाने मोजक्या फेऱ्या सुरू केल्या. परंतु यात ग्रामीण भागातील अत्यल्प फेऱ्यांचा समावेश असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून ग्रामीण भागातही दर अर्ध्या तासाला फेऱ्या सुरू करण्याची तयारी महामंडळाने केली आहे.

सध्या एसटी महामंडळाची ७५ टक्के वाहतूक सुरू आहे. यात महत्त्वाची शहरे आणि नागपुरातून ग्रामीण भागातील महत्त्वाच्या गावात तासाला एक बस सोडण्यात येत आहे. परंतु दर तासाला एक बस सोडल्यामुळे आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या पाहता या बसेस कमी पडत आहेत. ग्रामीण भागात अधिक फेऱ्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी जोर धरत होती. त्यामुळे एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. आगामी दोन ते तीन दिवसात एसटीची ९० टक्के वाहतूक सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने केली आहे. त्यानुसार काटोल, सावनेर, नरखेड, कळमेश्वर, रामटेक आदी महत्त्वाच्या ग्रामीण भागात सध्या दर तासाला असलेल्या वाहतुकीत वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार या गावांना दर अर्ध्या तासाला एक फेरी सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडून ग्रामीण भागातील प्रवाशांनाही सुविधा मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळणार काम

एसटीच्या फेऱ्या कमी सुरू असल्यामुळे रोजंदारी चालक-वाहकांना रजेवर पाठविण्यात येत होते. त्यांना काम मिळत नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. परंतु आता नागपूर विभागाने ग्रामीण भागातील फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियमित ड्युटी लागण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

मोठ्या गावातील फेऱ्या पूर्ववत

प्रवाशांच्या मागणीनुसार मोठ्या गावातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने घेतला आहे. शालेय विद्यार्थी फेऱ्या सोडून मोठ्या गावांना दर अर्ध्या तासाला बसेस सोडण्यात येतील. या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :state transportएसटीnagpurनागपूर