शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

नागपूर ग्रामीण भागासाठी दर अर्ध्या तासाला बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 00:49 IST

Buses for rural Nagpur कोरोनानंतर एसटी महामंडळाने मोजक्या फेऱ्या सुरू केल्या. परंतु यात ग्रामीण भागातील अत्यल्प फेऱ्यांचा समावेश असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून ग्रामीण भागातही दर अर्ध्या तासाला फेऱ्या सुरू करण्याची तयारी महामंडळाने केली आहे.

ठळक मुद्देएसटीचे नियोजन : ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सुविधा

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनानंतर एसटी महामंडळाने मोजक्या फेऱ्या सुरू केल्या. परंतु यात ग्रामीण भागातील अत्यल्प फेऱ्यांचा समावेश असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून ग्रामीण भागातही दर अर्ध्या तासाला फेऱ्या सुरू करण्याची तयारी महामंडळाने केली आहे.

सध्या एसटी महामंडळाची ७५ टक्के वाहतूक सुरू आहे. यात महत्त्वाची शहरे आणि नागपुरातून ग्रामीण भागातील महत्त्वाच्या गावात तासाला एक बस सोडण्यात येत आहे. परंतु दर तासाला एक बस सोडल्यामुळे आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या पाहता या बसेस कमी पडत आहेत. ग्रामीण भागात अधिक फेऱ्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी जोर धरत होती. त्यामुळे एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. आगामी दोन ते तीन दिवसात एसटीची ९० टक्के वाहतूक सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने केली आहे. त्यानुसार काटोल, सावनेर, नरखेड, कळमेश्वर, रामटेक आदी महत्त्वाच्या ग्रामीण भागात सध्या दर तासाला असलेल्या वाहतुकीत वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार या गावांना दर अर्ध्या तासाला एक फेरी सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडून ग्रामीण भागातील प्रवाशांनाही सुविधा मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळणार काम

एसटीच्या फेऱ्या कमी सुरू असल्यामुळे रोजंदारी चालक-वाहकांना रजेवर पाठविण्यात येत होते. त्यांना काम मिळत नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. परंतु आता नागपूर विभागाने ग्रामीण भागातील फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियमित ड्युटी लागण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

मोठ्या गावातील फेऱ्या पूर्ववत

प्रवाशांच्या मागणीनुसार मोठ्या गावातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने घेतला आहे. शालेय विद्यार्थी फेऱ्या सोडून मोठ्या गावांना दर अर्ध्या तासाला बसेस सोडण्यात येतील. या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :state transportएसटीnagpurनागपूर