शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उन्हाळ्याचे ‘व्हेकेशन’, चोरांसाठी ‘सिझन’; १५ दिवसात ३७ हून अधिक घरांत डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 14:37 IST

मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते.

ठळक मुद्दे४० टक्के प्रकरणांत मालक बाहेरगावी गेलेले घर ‘टार्गेट’

योगेश पांडे

नागपूर : उन्हाळ्याची सुट्टी सुरू असल्याने उपराजधानीतील अनेकजण कुटुंबासह बाहेरगावी जातात. यावेळी कितीही दक्षता घेतली तरी चोरट्यांच्या नजरा अशा घरांचा शोध घेतच असतात अन् संधी मिळताच ते त्यांना ‘टार्गेट’ करतात. मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडतात. अनेकजण गच्चीवर झोपण्याचा आनंद घेतात तर काहीजण बाहेरगावी जातात. अशावेळी घराला कुलूप लावून जाणेदेखील सुरक्षित नसते. घरात लोक असतानाही चोरांनी घरात शिरून चोरी केल्याच्या घटना घडतात. शिवाय कुलरच्या आवाजामुळे अगदी बाजूच्या खोलीत काय सुरू आहे, याची कल्पनादेखील येत नाही. यामुळे चोरांचे काम आणखी सोपे होते. नागपूर पोलिसांच्या गुन्हे नोंदीनुसार विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३७ हून अधिक प्रकरणांत चोरांनी घर किंवा इमारतीच्या आत शिरून चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील १५ हून अधिक गुन्ह्यांमध्ये घरमालक कुलूप लावून लग्नसमारंभ अथवा गावाला गेले होते. घरी परत आल्यावरच त्यांना घरफोडी झाल्याचे समजले. अद्यापही बहुतांशी घरे व कॉलन्यांमध्ये सीसीटीव्ही नाही. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यातही अनेक अडथळे येतात.

हुडकेश्वर, बजाजनगर, बेलतरोडी ‘टार्गेट’

शहर पोलिसांच्या गुन्हे नोंदीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसात घरात शिरून चोरीच्या सहा घटना घडल्या. बजाजनगर पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे चार गुन्हे नोंदविण्यात आले. तर बेलतरोडी, एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत घरात शिरून चोरी किंवा घरफोडीच्या प्रत्येकी तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

‘सोशल मीडिया’वरील ‘अपडेट्स’ टाळा

सबकुछ ऑनलाईनच्या जमान्यात अनेकजण बाहेरगावी जाताना अगदी ‘सेल्फी’सह सर्व ‘अपडेट्स’ टाकतात. यामुळे अनेकांना तुम्ही कुठे व किती दिवसांसाठी गेला आहात, याची कल्पना येते. चोरांना अशा ‘अपडेट्स’ मिळाल्या तर त्यांच्या हाती आयते कोलीतच सापडते. त्यामुळे अशाप्रकारच्या ‘अपडेट्स’ टाळल्या पाहिजेत, असे आवाहन ‘सोशल मीडिया’ तज्ज्ञ अजित पारसे यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीnagpurनागपूर