शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वनरक्षकाची दादागिरी, गुराख्यांना जबर मारहाण; उठबशा काढून काेंबडा करायला लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 14:10 IST

दहेगाव परिसरातील घटना

कुही (नागपूर) : राेडलगत शेळ्या चारत असलेल्या दाेन गुराख्यांना वनरक्षकाने विनाकारण शिवीगाळ करीत आधी उठबशा मारायला लावल्या. त्यानंतर दाेघांनाही काेंबडा करायला लावत बेदम मारहाण केली. यात दाेघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांला उपचारार्थ नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले आहे. ही घटना उमरेड-कऱ्हाडला अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या दहेगाव (ता. कुही) परिसरात साेमवारी (दि. २८) दुपारी २ ते ३ वाजताच्या दरम्यान घडली.

राजेंद्र श्रावण घरडे (५५, रा. रेंगातूर, ता. कुही) व गणेश किसन वासनिक (४५, रा. परसोडी-राजा, ता. कुही) अशी जखमींची नावे असून, महेश कुथे असे मारहाण करणाऱ्या वनरक्षकाचे नाव आहे. दाेघेही साेमवारी दुपारी गोठणगाव-डोंगरमौदा रोडवरील दहेगाव कुटीसमोर त्यांच्या शेळ्या चारत उभे हाेते. महेश कुथे त्यांच्याजवळ आला आणि त्याने दाेघांनाही विनाकारण शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्याने दाेघांनाही उठाबशा काढायला लावल्या व नंतर त्यांचा कोंबडा करीत काठीने जबर मारहाण करायला सुरुवात केली.

यात दाेघांच्याही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. एवढेच नव्हे तर, दाेघांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारून वनसमिती अध्यक्षाला हा दंड वसूल करण्याचीही महेश कुथे याने सूचना केली. माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी दाेघांना वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले. शिवाय, पाेलिसत तक्रारही दाखल केली. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी महेश कुथेच्या विराेधात भादंवि ३२४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास ठाणेदार सतीश पाटील करीत आहेत.

वनरक्षकांची दादागिरी वाढली

महेश कुथे याने दाेन्ही गुराख्यांना काठीने अमानुष मारहाण केली. त्यामुळे त्यांना साधे उभे राहणे शक्य नसल्याने वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील डाॅक्टरांनी त्यांच्यावर प्रथमाेपचार केले आणि नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले. दाेन वर्षांपूर्वी एका वनरक्षकाने पांढरगोठा व कऱ्हाडला येथील गुराख्यांना अशीच अमानुष मारहाण केली हाेती. प्रशासन या वनरक्षकांना आवर घालत नसल्याने तसेच त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने त्यांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे, असा आराेप स्थानिकांनी केला असून, महेश कुथेला बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या वनरक्षकाला त्याच्या वर्तनात सुधारणा करण्याची सूचना केली हाेती. परंतु, त्याच्या वर्तनात सुधारणा हाेताना दिसून येत नाही. त्याने गरीब नागरिकांना त्रास देणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे या प्रकरणात पाेलिस नियमानुसार कारवाई करणार आहे.

- सतीश पाटील, ठाणेदार, पाेलिस ठाणे, वेलतूर, ता. कुही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभागnagpurनागपूर