शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

बिल्डर सागर रतनला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:22 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २५ कोटी रुपये किमतीची जमीन केवळ ३.५७ कोटी रुपयात बळकावणाºया चर्चित बिल्डर सागर रतन आणि त्याच्या एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या एसआयटीने अटक केली आहे. एसआयटीच्या या कारवाईमुळे बिल्डर लॉबी हादरली आहे. विकास जैन (५०) रा. संघ बिल्डिंग महाल, असे सागर रतनच्या साथीदाराचे नाव आहे.बेसा येथे मिलिंद ...

ठळक मुद्दे३.५७ कोटीत बळकावली २५ कोटीची जमीनविकास जैनही अडकला : एसआयटीच्या तपासात खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २५ कोटी रुपये किमतीची जमीन केवळ ३.५७ कोटी रुपयात बळकावणाºया चर्चित बिल्डर सागर रतन आणि त्याच्या एका साथीदाराला गुन्हे शाखेच्या एसआयटीने अटक केली आहे. एसआयटीच्या या कारवाईमुळे बिल्डर लॉबी हादरली आहे. विकास जैन (५०) रा. संघ बिल्डिंग महाल, असे सागर रतनच्या साथीदाराचे नाव आहे.बेसा येथे मिलिंद सोसायटी आहे. या सोसायटीची स्थापना १९८७-८८ मध्ये झाली. त्यावेळी सोसायटीचे सचिव शालिकराम ढोरे होते. ढोरेने सोसायटीच्या मालकीची ४ एकर जागा ७० प्लॉट धारकांना विकली. पोलीस सूत्रानुसार २००३ मध्ये ढोरेने सचिवपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या उपस्थितीत संदीप विश्वलोचन जैनला अध्यक्ष आणि त्यांचे साळे विकास रामचंद्र जैन (५०) याला सचिव नियुक्त केले. त्यांच्या परिवारातील इतर सात सदस्यांनाही मिलिंद सोसायटीचे पदाधिकारी बनवण्यात आले. याप्रकारे संदीप जैन आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित झाले. संदीप सोसायटीचा अध्यक्ष बनला.संदीप जैनने जुलै २००५ मध्ये सोसायटीच्या सात-बारावर आपले नाव नोंदविले. जमीन प्लॉट धारकांच्या ताब्यात आल्याने संदीप त्याला विकू शकत नव्हता. २००८ मध्ये ही जमीन मिलिंद पुराणिक यांना विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची माहिती होताच काही प्लॉटधारकांनी न्यायालयाचा आश्रय घेतला. पुराणिकच्या वकिलांनी न्यायालयात त्यांच्याकडून जमीन विकत घेतल्याची बाब स्पष्टपणे नाकारली. मिलिंद सोसायटीतील सभासदांनी सुद्धा जमिनीची विक्री करण्यात आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण रद्द करण्यात आले.१४ आॅगस्ट २००३ रोजी जैन परिवाराने वार्षिक आमसभेत जमीन विकण्याचा प्रस्ताव पारित केला. यानंतर १७ जून २०१६ रोजी जैनने साथीदारांच्या मदतीने जमिनीवर कब्जा केला. प्लॉटधारकांना धमकावून हाकलले. काही प्लॉटधारकांनी केलेले बांधकामही पाडण्यात आले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी संदीप जैन आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला होता. जैन परिवाराने अवैधपणे कब्जा केल्याने काही सदस्यांनी न्यायालयातही याचिका दाखल केल्या होत्या. जैन परिवाराच्या कारभाराबाबत अनेक तक्रारी येत असल्याने ३१ मार्च २०१७ रोजी सहकार विभागाने सोसायटीवर प्रशासक नियुक्त केला. प्रशासक नियुक्तीची माहिती होताच जैन परिवाराने ३१ मार्च रोजी जमीन मे. लक्ष्मी रतन बिल्डरचे संचालक सागर सत्यनारायण रतनला ३.५७ कोटी रुपयात विकली.तसेच जमिनीचा कब्जाही दिला. रजिस्ट्री केल्यानंतर चार दिवसानंतर ५ एप्रिल रोजी सागर रतनने जमिनीवर आपल्या नावाचा बोर्ड उभारून बांधकाम सुरू केले. यानंतर प्लॉटधारक आणि सोसायटीच्या माजी पदाधिकाºयांनी याची एसआयटीकडे तक्रार केली.पोलीस निरीक्षक ललित वर्टीकर यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना तपासात आढळून आले की, रेडीरेकनरनुसार जमीन ३ कोटी ५६ लाख ४ हजार रुपये किमतीची आहे. परंतु बाजारभावानुसार या जमिनीची किंमत तब्बल २५ कोटी इतकी आहे. रजिस्ट्री खर्च, मुद्रांक शुल्क, दस्तावेज तयार करण्याचा खर्च आणि टीडीएससुद्धा रतनऐवजी जैन परिवारानेच भरला. साधारणपणे हा खर्च जमिनीची खरेदी करणाºयाला भरावा लागतो.सागर रतन याला जमिनीची मालकी आणि जैन परिवाराला सोसायटीचे पदाधिकारी बनविण्यात आल्याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे, याची माहिती होती. यानंतरही त्याने जमिनीची खरेदी करताना त्याने कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण केली नाही. या आधारावर एसआयटीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सागर रतन आणि विकास जैन याला अटक केली. जैन परिवाराने ज्या प्रस्तावाच्या आधारावर जमिनीची विक्री केली आहे, तो प्रस्तावच अवैध असल्याचीही माहिती पुढे आली आहे. या प्रस्तावात स्वाक्षरी असणाºया काही सदस्यांनी त्यांच्या बोगस स्वाक्षºया असल्याचे सांगितले आहे.पोलीस काय करीत होतेसूत्रानुसार या प्रकरणातील पीडितांनी अगोदर हुडकेश्वर आणि गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. परंतु कुणीही याला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पोलिसांनीसुद्धा आरोपींना संरक्षण देण्याचेच काम केले. हे प्रकरण एसआयटीकडे आल्यावरच त्याला गती मिळाली.परिवाराच्या मदतीने फसवणूकपोलीस सूत्रानुसार, जैन परिवाराची सेंट्रल एव्हेन्यूवर हिरा फायनान्स नावाची कंपनी आहे. या प्रकरणात संदीप जैनचा साळा विकास जैन याच्याशिवाय परिवारातील इतर सदस्यही सहभागी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. सोसायटीची संपत्ती बळकावण्यासाठीच जैन परिवाराने त्यावर कब्जा केल्याचा पोलिसांना संशय आहे. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पदाधिकारी बनवून जैनने सोसायटी कायद्याचेही उल्लंघन केले आहे. सागर रतन स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत आहे.