शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घर तिथे सैनिक, गाव तिथे शाखा निर्माण करा

By आनंद डेकाटे | Updated: May 6, 2024 18:39 IST

दीक्षाभूमीवरून समता सैनिक दलाचे आवाहन : राष्ट्रीय संमेलनात देशभरातून प्रतिनिधी सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात बंधूभाव रूजवणे आणि संविधानिक रिपब्लिकन विचार मजबूत करण्याचा संकल्प समता सैनिक दलाने घेतला आहे. यासाठी घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण करून घराघरातून नवप्रशिक्षित सैनिक घडवण्यात यावे, असे आवाहन समता सैनिक दलाने सोमवारी दीक्षाभूमीवरून केले.

समता सैनिक दलाच्या ध्वज दिनाच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी दीक्षाभूमी येथील कर्मवारी एड. दादासाहेब कुंभारे सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला देशभरातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. भदंत नाग दीपंकर महास्थविर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे हे मुख्य मार्गदर्शक होते. तर राष्ट्रीय जीओसी प्रदीप एस. डोंगरे, राष्ट्रीय स्टाफ ऑफीसर प्राचार्य गजेंद्र गजभिये, राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्राचार्य संजय घोडके, राष्ट्रीय ट्रेनिंग चिफ संघप्रिय नाग, अमर दीपंकर, पृथ्वी मोटघरे, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे चंद्रबोधी पाटील, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्यासह आदित्य बोधी (छत्तीसगड), एड. हरिश लोणारे (मध्यप्रदेश), डाॅ. अजय सिग चहल (हरियाणा) हे प्रामुख्याने व्यासपीठावर होते.

याप्रसंगी विविध वक्त्यांनी समता सैनिक दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. समाजातील अन्याय अत्याचाराविरोधात तसेच जनजागृतीसाठी समता सैनिक दलाची भूमिका यावरही विचार व्यक्त करण्यात आले. एकूणच आजची परिस्थितीत समता सैनिक दलाला महत्त्वाची भूमिका बजवायची असून यासाठी देशभरात गावागावांमध्ये समता सैनिक दलाची शाखा निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

राजकुमार वंजारी, दुर्गेश थुल, प्रमोद खांडेकर सुभाष खरे,आर. सी. फुल्लुके, आकाश मोटघरे, बी. एम बागडे, नरेंद्र रामटेके मुनेश्वर नागदेवे विलास नागदेवे गोवर्धन वानखेडे, युवराज बडगे, रमेश रंगारे आदींसह देशातील विविध राज्यातील प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर