शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

Budget 2020: करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थसंकल्पामुळे अधिकच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:47 IST

प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोंधळ उडविणारा अर्थसंकल्प सादर केल्याचे दिसत आहे. प्राप्तिकराचे नवीन दर जाहीर झाल्याने गोंधळच उडणार आहे. करदात्यांना जुन्या दराप्रमाणे कर भरण्याची मुभा ठेवताना नवीन करप्रणालीही ऐच्छिक ठेवली आहे. नव्या प्रणालीत करदात्यांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार नाही. जुन्या प्रणालीत तो मिळेल. याशिवाय पगारदार करदात्यांचा टीडीएस कापला जाईल की नाही, याचा खुलासा कंपन्यांना करावा लागेल. त्यामुळे प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार आहे.

शिवाय कंपनीकर व व्यक्तिगत प्राप्तिकर यांचे ४.८३ लाख करविवाद वेगवेगळ्या न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत. ते मिटविण्यासाठी ‘सबका विश्वास’च्या धर्तीवर ‘विवाद से विश्वास’ योजना सरकारने आणली आहे. ‘लोकमत’चे हे भाकीत खरे ठरले, पण या योजनेत दंड आणि व्याज न भरता सहभागी होण्याची मुदत ३१ मार्च, २०२० असल्याने दोन महिन्यांत कर्जदात्यांना हा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे या योजनेचा नेमका किती फायदा होईल, हा प्रश्नच आहे.

अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सीतारामन यांनी काही प्रयत्न केले आहेत. त्यात नॅशनल टेक्सटाइल मिशनसाठी १,४८० कोटी, पायाभूत क्षेत्रासाठी १ लाख ३ हजार कोटी रुपयांची नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन, बांधकाम उद्योगातून रोजगार निर्मितीसाठी २,५०० किमीचे हायवे, ९,००० किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर, २,००० किमीचे कोस्टल रोड हे प्रस्ताव आहेत, तसेच ६,००० किमीचे नॅशनल हायवे खासगी कंपन्यांना संचालनासाठी देण्याची योजना आहे, पण फास्टॅग योजना यशस्वी झाली नसताना हे कसे शक्य होणार, हा प्रश्न आहे.

दळणवळण व मालवाहतूक या क्षेत्रावर १ लाख ७ हजार कोटी खर्च करण्याची योजना आहे, तसेच २०२४ पर्यंत १०० नवे विमानतळ बांधण्याचा संकल्प आहे. हे अतिशयोक्त वाटते. ऊ र्जा व रिन्युएबल ऊर्जा क्षेत्रावर २२ हजार कोटी रुपये तरतूद स्वागतार्ह आहे.लघू व मध्यम उद्योग, मोठे उद्योग, आर्थिक बाजार या क्षेत्रांसाठी बजेटमध्ये भरघोस तरतूद आहे. हे करताना वित्तीय तूट ८ लाख ४० हजार कोटींवर जाईल, असा अंदाज आहे.

बजेटमध्ये २०२०-२०२१ साठी उत्पन्न २२ लाख ४६ हजार कोटी तर खर्च ३० लाख ४२ हजार कोटी दाखविला आहे. त्यामुळे वित्तीय तूट जीडीपीच्या साडेतीन टक्के राहण्याचा अंदाज आहे. फिस्कल रीस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅण्ड बजेट मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (एफआरबीएम कायदा) अंतर्गत ही तूट जीडीपीच्या साडेतीन टक्के हवी. त्याकडे सीतारामन यांचे दुर्लक्ष झाले आहे. ते करताना सीतारामन यांनी सरकारची बाजारातून कर्ज उभारण्याची मर्यादा गेल्या वर्षीच्या ४ लाख ९९ हजार कोटींवरून ५ लाख ३६ हजार कोटी केली आहे. याचा अर्थ सरकार कर्ज काढून अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करणार आहे, हे योग्य नाही.

गती मिळणार तरी कशी?

अर्थसंकल्पातील डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स अंदाजाप्रमाणे मागे घेतला गेला आहे. त्यामुळे एकाच उत्पनावर दोनदा करभरणा होणार नाही. नव्या वीजनिर्मिती कंपन्यांना १५ टक्के कंपनीकराची सवलत, विदेशी गुंतवणूक फंडांना प्राधान्यक्रम असलेल्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्यास कंपनीकरातून १०० टक्के सूट, सहकारी संस्थांना ३0 टक्क्यांहून २२ टक्के प्राप्तिकर आणि व्यापारी बँकांच्या ठेवींवरील विमा संरक्षणाची मर्यादा एक लाखांवरून पाच लाख रुपये या बाबी समाधानाच्या आहेत, पण त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती कशी मिळणार, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

टॅग्स :budget 2020बजेटIncome Taxइन्कम टॅक्सbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनTaxकरIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र