शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थसंकल्पामुळे अधिकच गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:47 IST

प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार

- सोपान पांढरीपांडे

नागपूर : करप्रणाली सोपी करण्याच्या प्रयत्नांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोंधळ उडविणारा अर्थसंकल्प सादर केल्याचे दिसत आहे. प्राप्तिकराचे नवीन दर जाहीर झाल्याने गोंधळच उडणार आहे. करदात्यांना जुन्या दराप्रमाणे कर भरण्याची मुभा ठेवताना नवीन करप्रणालीही ऐच्छिक ठेवली आहे. नव्या प्रणालीत करदात्यांना स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार नाही. जुन्या प्रणालीत तो मिळेल. याशिवाय पगारदार करदात्यांचा टीडीएस कापला जाईल की नाही, याचा खुलासा कंपन्यांना करावा लागेल. त्यामुळे प्राप्तिकर भरणे करदात्यांसाठी किचकट आणि गुंतागुंतीचे होणार आहे.

शिवाय कंपनीकर व व्यक्तिगत प्राप्तिकर यांचे ४.८३ लाख करविवाद वेगवेगळ्या न्यायाधिकरणात प्रलंबित आहेत. ते मिटविण्यासाठी ‘सबका विश्वास’च्या धर्तीवर ‘विवाद से विश्वास’ योजना सरकारने आणली आहे. ‘लोकमत’चे हे भाकीत खरे ठरले, पण या योजनेत दंड आणि व्याज न भरता सहभागी होण्याची मुदत ३१ मार्च, २०२० असल्याने दोन महिन्यांत कर्जदात्यांना हा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे या योजनेचा नेमका किती फायदा होईल, हा प्रश्नच आहे.

अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी सीतारामन यांनी काही प्रयत्न केले आहेत. त्यात नॅशनल टेक्सटाइल मिशनसाठी १,४८० कोटी, पायाभूत क्षेत्रासाठी १ लाख ३ हजार कोटी रुपयांची नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन, बांधकाम उद्योगातून रोजगार निर्मितीसाठी २,५०० किमीचे हायवे, ९,००० किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर, २,००० किमीचे कोस्टल रोड हे प्रस्ताव आहेत, तसेच ६,००० किमीचे नॅशनल हायवे खासगी कंपन्यांना संचालनासाठी देण्याची योजना आहे, पण फास्टॅग योजना यशस्वी झाली नसताना हे कसे शक्य होणार, हा प्रश्न आहे.

दळणवळण व मालवाहतूक या क्षेत्रावर १ लाख ७ हजार कोटी खर्च करण्याची योजना आहे, तसेच २०२४ पर्यंत १०० नवे विमानतळ बांधण्याचा संकल्प आहे. हे अतिशयोक्त वाटते. ऊ र्जा व रिन्युएबल ऊर्जा क्षेत्रावर २२ हजार कोटी रुपये तरतूद स्वागतार्ह आहे.लघू व मध्यम उद्योग, मोठे उद्योग, आर्थिक बाजार या क्षेत्रांसाठी बजेटमध्ये भरघोस तरतूद आहे. हे करताना वित्तीय तूट ८ लाख ४० हजार कोटींवर जाईल, असा अंदाज आहे.

बजेटमध्ये २०२०-२०२१ साठी उत्पन्न २२ लाख ४६ हजार कोटी तर खर्च ३० लाख ४२ हजार कोटी दाखविला आहे. त्यामुळे वित्तीय तूट जीडीपीच्या साडेतीन टक्के राहण्याचा अंदाज आहे. फिस्कल रीस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅण्ड बजेट मॅनेजमेंट अ‍ॅक्ट (एफआरबीएम कायदा) अंतर्गत ही तूट जीडीपीच्या साडेतीन टक्के हवी. त्याकडे सीतारामन यांचे दुर्लक्ष झाले आहे. ते करताना सीतारामन यांनी सरकारची बाजारातून कर्ज उभारण्याची मर्यादा गेल्या वर्षीच्या ४ लाख ९९ हजार कोटींवरून ५ लाख ३६ हजार कोटी केली आहे. याचा अर्थ सरकार कर्ज काढून अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करणार आहे, हे योग्य नाही.

गती मिळणार तरी कशी?

अर्थसंकल्पातील डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स अंदाजाप्रमाणे मागे घेतला गेला आहे. त्यामुळे एकाच उत्पनावर दोनदा करभरणा होणार नाही. नव्या वीजनिर्मिती कंपन्यांना १५ टक्के कंपनीकराची सवलत, विदेशी गुंतवणूक फंडांना प्राधान्यक्रम असलेल्या उद्योग क्षेत्रात गुंतवणूक केल्यास कंपनीकरातून १०० टक्के सूट, सहकारी संस्थांना ३0 टक्क्यांहून २२ टक्के प्राप्तिकर आणि व्यापारी बँकांच्या ठेवींवरील विमा संरक्षणाची मर्यादा एक लाखांवरून पाच लाख रुपये या बाबी समाधानाच्या आहेत, पण त्यांच्यामुळे अर्थव्यवस्थेला गती कशी मिळणार, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

टॅग्स :budget 2020बजेटIncome Taxइन्कम टॅक्सbudget sector analysisबजेट क्षेत्र विश्लेषणNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनTaxकरIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र