शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक  : सी.एल. थूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:58 IST

देशात समान नागरी कायदा असावा. परंतु जोपर्यंत संविधानानुसार समान नागरी कायदा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरिती व रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार असावे. त्यामुळे बौद्धांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य आणि राज्य शासनाने गठित केलेल्या बौद्ध विवाह कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल यांनी येथे केले.

ठळक मुद्दे दीक्षाभूमीवर सामाजिक न्यायमंत्री बडोले यांना कायद्याचे प्रारूप हस्तांतरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात समान नागरी कायदा असावा. परंतु जोपर्यंत संविधानानुसार समान नागरी कायदा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरिती व रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार असावे. त्यामुळे बौद्धांच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी बौद्धांचा स्वतंत्र विवाह कायदा आवश्यक आहे, असे प्रतिपादन अनुसूचित जाती जमाती समितीचे सदस्य आणि राज्य शासनाने गठित केलेल्या बौद्ध विवाह कायदा प्रारूप समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थुल यांनी येथे केले.या समितीने तयार केलेल्या बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप शनिवारी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना हस्तांतरित करण्यात आले. लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमीवर आयोजित या प्रारूप हस्तांतरण सोहळ्याला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, प्रारूप समितीचे सदस्य आ. डॉ. मिलिंद माने, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, समितीचे सदस्य अ‍ॅड. दिलीप काकडे , बबन कांबळे, भय्याजी खैरकर, विजय कांबळे, डी. आर. महाजन, अ‍ॅड. अविनाश बनकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, एल.आर. सुटे, भंते हर्षदीप आदी उपस्थित होते.सी.एल. थूल यांनी बौद्ध विवाह कायदा तयार करण्यामागची भूमिका विषद करीत यासाठी सुरुवातीपासून कसा पुढाकार झाला, याची माहिती दिली. बौद्ध समाजासाठी सर्वसमावेशक असे हे कायद्याचे प्रारूप तयार झाले आहे. यानंतर ते इंटरनेटवर लोकांसाठी उपलब्ध केले जाईल. लोकांच्या या संबंधात काही आक्षेप व तक्रारी असतील, ते विचारात घेऊन सुधारणा केली जाईल, त्यानंतर ते विधिमंडळात मांडण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. मिलिंद माने, दिनेश वाघमारे, भय्याजी खैरकर, अविनाश बनकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.संचालन वामन सोमकुंवर यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे समन्वयक डॉ. सिद्धार्थ गायकवाड, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे सचिन मून, मोनाल थुल, विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. सच्चिदानंद दारुंडे, शिवदास वासे, ललित खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर