शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

बुद्धांचे तत्त्वज्ञान हा जगण्याचा भाग व्हावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 21:44 IST

Nagpur News नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.

ठळक मुद्देअहंकार, तृष्णेतून गटांची निर्मिती

नागपूर : ‘अहंकार आणि तृष्णेतून गटांची निर्मिती होते. सर्व संघ राहिले पाहिजे. एकीकरण हा मोठा विषय आहे. तो पोटतिडकीने हाती घेतला पाहिजे. नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.

बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघाच्या वतीने दीक्षाभूमी येथे ‘संघयान संकल्प परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेचे उद्घाटक पालकमंत्री नितीन राऊत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम, भदंत हर्षबोधी उपस्थित होते.

मनोहर म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धम्मदीक्षा देऊन पूर्वीची जाती, पोटजाती व्यवस्था नाकारली; परंतु जुनी व्यवस्था पुन्हा येणार असल्याचे संकेत आहे. अनेक गोष्टी त्याचा इशारा देत आहे. हे समजण्याची गरज आहे. आपली लोक अनेक संघटना, गटात विखुरल्या आहेत. भिक्खू संघाचेही अनेक गट आहेत. सर्वांनी एकसंध झाले पाहिजे. बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. बुद्धांनी त्याच वेळी याची बीजे पेरली आहेत. गणतंत्र, प्रजातंत्र ही व्यवस्था श्रमण संस्कृतीतून घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या काळात संघटनेचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याची गरज आहे. सर्वच समाजाला जोडण्याची गरज आहे. तुमच्या वागणुकीतून बुद्धांचे त्रिशरण, पंचशील व्यक्त झाले पाहिजे. बुद्ध तुमच्या वाणीतून नाही तर करणीतून दिसायला हवे,’ असे ते म्हणाले. वामन मेश्राम यांनी सर्वांनी एकत्र राहण्याचे मत व्यक्त केले. भिक्खूंचाही एकसंध असायला हवे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा