शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

बुद्धांचे तत्त्वज्ञान हा जगण्याचा भाग व्हावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 21:44 IST

Nagpur News नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.

ठळक मुद्देअहंकार, तृष्णेतून गटांची निर्मिती

नागपूर : ‘अहंकार आणि तृष्णेतून गटांची निर्मिती होते. सर्व संघ राहिले पाहिजे. एकीकरण हा मोठा विषय आहे. तो पोटतिडकीने हाती घेतला पाहिजे. नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.

बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघाच्या वतीने दीक्षाभूमी येथे ‘संघयान संकल्प परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेचे उद्घाटक पालकमंत्री नितीन राऊत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम, भदंत हर्षबोधी उपस्थित होते.

मनोहर म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धम्मदीक्षा देऊन पूर्वीची जाती, पोटजाती व्यवस्था नाकारली; परंतु जुनी व्यवस्था पुन्हा येणार असल्याचे संकेत आहे. अनेक गोष्टी त्याचा इशारा देत आहे. हे समजण्याची गरज आहे. आपली लोक अनेक संघटना, गटात विखुरल्या आहेत. भिक्खू संघाचेही अनेक गट आहेत. सर्वांनी एकसंध झाले पाहिजे. बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. बुद्धांनी त्याच वेळी याची बीजे पेरली आहेत. गणतंत्र, प्रजातंत्र ही व्यवस्था श्रमण संस्कृतीतून घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या काळात संघटनेचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याची गरज आहे. सर्वच समाजाला जोडण्याची गरज आहे. तुमच्या वागणुकीतून बुद्धांचे त्रिशरण, पंचशील व्यक्त झाले पाहिजे. बुद्ध तुमच्या वाणीतून नाही तर करणीतून दिसायला हवे,’ असे ते म्हणाले. वामन मेश्राम यांनी सर्वांनी एकत्र राहण्याचे मत व्यक्त केले. भिक्खूंचाही एकसंध असायला हवे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा