शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बुद्धांचे तत्त्वज्ञान हा जगण्याचा भाग व्हावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 21:44 IST

Nagpur News नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.

ठळक मुद्देअहंकार, तृष्णेतून गटांची निर्मिती

नागपूर : ‘अहंकार आणि तृष्णेतून गटांची निर्मिती होते. सर्व संघ राहिले पाहिजे. एकीकरण हा मोठा विषय आहे. तो पोटतिडकीने हाती घेतला पाहिजे. नुसते बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. तर तो जगण्याचा भाग झाला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी येथे केले.

बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघाच्या वतीने दीक्षाभूमी येथे ‘संघयान संकल्प परिषद’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेचे उद्घाटक पालकमंत्री नितीन राऊत होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम, भदंत हर्षबोधी उपस्थित होते.

मनोहर म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धम्मदीक्षा देऊन पूर्वीची जाती, पोटजाती व्यवस्था नाकारली; परंतु जुनी व्यवस्था पुन्हा येणार असल्याचे संकेत आहे. अनेक गोष्टी त्याचा इशारा देत आहे. हे समजण्याची गरज आहे. आपली लोक अनेक संघटना, गटात विखुरल्या आहेत. भिक्खू संघाचेही अनेक गट आहेत. सर्वांनी एकसंध झाले पाहिजे. बुद्धांनी भिक्खू संघाची स्थापना केली. बुद्धांनी त्याच वेळी याची बीजे पेरली आहेत. गणतंत्र, प्रजातंत्र ही व्यवस्था श्रमण संस्कृतीतून घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याचे स्पष्टीकरण दिले आहे. सध्याच्या काळात संघटनेचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याची गरज आहे. सर्वच समाजाला जोडण्याची गरज आहे. तुमच्या वागणुकीतून बुद्धांचे त्रिशरण, पंचशील व्यक्त झाले पाहिजे. बुद्ध तुमच्या वाणीतून नाही तर करणीतून दिसायला हवे,’ असे ते म्हणाले. वामन मेश्राम यांनी सर्वांनी एकत्र राहण्याचे मत व्यक्त केले. भिक्खूंचाही एकसंध असायला हवे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमा