शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांचा शांतीचा संदेशच सर्व जगासाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:02 IST

तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

ठळक मुद्देरामदास आठवले : आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेला सुरुवातदेश-विदेशातील प्रतिनिधींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या शांती व अहिंसा या मार्गाचाच सर्व जगाने स्वीकार केला असून, त्यांचा विश्वशांतीचा संदेश हा जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था (बार्टी) व समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वैशाख दिन (बौद्ध पौर्णिमानिमित्त) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय शांती व समता’ परिषदेचे शनिवारी थाटात उद्घाटन पार पडले. उद्घाटन सत्राप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर, रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. डॉ. मिलिंद माने, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड, गिरीश गांधी, माजी कुलगुरू एस. एन. पठाण, अब्दुल फलाही, आचार्य लोकेश मुनी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, थायलंड, भूतान, फिलिपाईन्स, लडाख तसेच लंडन येथील भंते व विद्वान उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सर्वांचे स्वागत करण्यात आले.नागपूर ही ऐतिहासिक भूमी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी पवित्र दीक्षाभूमीत बौद्ध धमाची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना दिली. देश-विदेशातील बुद्धिस्ट विचारवंत तसेच शांततेचा पुरस्कार करणारे सर्वधर्मीय धर्मगुरू, तत्त्ववेत्ते या नागपूर नगरीमध्ये आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेच्या माध्यमातून एकत्र आले, ही बाब अभिमानास्पद असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. महादेव जानकर, खा. कृपाल तुमाने, विश्वनाथ कराड, आचार्य लोकेश मुनी, सुलेखा कुंभारे यांनीही विचार व्यक्त केले.बुद्धांच्या तत्त्वज्ञानाच्या अनुसरणाने जगभर प्रज्ञा, शील व करुणा यांचा संदेश पोहचेल, अशी आशा प्रास्ताविकपर भाषणात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली. संचालन शैलजा शेलगावकर व धर्मेश धवनकर यांनी केले. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी आभार मानले.मुख्यमंत्र्यांनी साधला‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंंग’द्वारे संवादमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी नागपूर शहराची निवड केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. जगात अराजकता व अशांततेचे वातावरण असताना बुद्धाच्या धम्मक्रांतीने प्रस्थापित झालेली शांती व समता या परिषदेद्वारे जगभर पसरेल, असे आपल्या संदेशात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.आठवलेंच्या भाषणप्रसंगी नारेबाजीया परिषदेबाबत काही आंबेडकरी संघटनांनी आक्षेप घेतला होता. ही परिषद भाजपा-व आरएसएसप्रणीत असल्याने त्याला आमचा विरोध असल्याचे पत्रही विभागाला पाठवले होते. त्याचे पडसाद उद्घाटनप्रसंगी दिसून आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे भाषणासाठी उभे राहताच नाटककार व आंबेडकरी कार्यकर्ते संजय जीवने आणि काही कार्यकर्ते उठून उभे झाले आणि त्यांनी नारेबाजी करायला सुरुवात केली. ही परिषद भाजपा-आरएसएसप्रणीत असल्याने त्याचा निषेध असो. आठवले मुर्दाबाद असे नारे दिले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना पकडून बाहेर नेले. ‘मुर्दाबाद करणारे जसे असतात तसे जिंदाबाद करणारेही आहेतच, आपण विरोध करा मी पुढे जातो, असे सांगत आठवले यांनी आपल्या शैलीत विरोध करणाऱ्यांची फिरकी घेतली; नंतर आठवले यांचे भाषण सुरळीत पार पडल्यानंतर भंते ज्ञानज्योती यांनी माईकवर येऊन परिषदेबाबत निषेध व्यक्त केला. या विरोधामुळेच डॉ. सुखदेवराव थोरातही कार्यक्रमाला आले नाहीत. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर