शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

बुद्ध महोत्सव : आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक :सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:09 IST

गरिबी नागरिकाला त्याचा राजकीय स्वातंत्र्यापासून अलिप्त ठेवते. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक ठरतात तेव्हा आर्थिक समानता व सामाजिक समानता हे राजकीय लोकशाहीकरिता अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

ठळक मुद्देलोकशाही या विषयावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरिबी नागरिकाला त्याचा राजकीय स्वातंत्र्यापासून अलिप्त ठेवते. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक ठरतात तेव्हा आर्थिक समानता व सामाजिक समानता हे राजकीय लोकशाहीकरिता अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवात गुरुवारी दुसऱ्या दिवशी रत्नावली व्याख्यानमालेंतर्गत लोकशाही या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. डॉ. थोरात म्हणाले, भारत हा सामान्य जनतेचा देश आहे, सार्वभौम आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही. लोकशाहीमध्येलोकनिर्वाचित प्रतिनिधींनी जनतेकरिता कार्य करण्याची अपेक्षा असते, पण तसे होताना दिसत नाही, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. राष्ट्र आणि धर्म हे दोन वेगवेगळे सिद्धांत आहेत आणि ते स्वतंत्रपणे कार्य करतात. राष्ट्र कल्पनेत धर्म घुसविला की राष्ट्राची महत्ता संपते. भारतीय संविधानामधे निहत मूलभूत अधिकार आणि राष्ट्राची एकता हे राष्ट्राचा पाया आहेत. याव्यतिरिक्त कोणतीही असंवैधानिक गोष्ट आणता येत नाही, परंतु आज अशा गोष्टी आणण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय लोकशाही संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले इशारे आज सत्य होताना दिसत आहेत. ज्या धोरणांमुळे मागासवर्गीय, अल्पसंख्यकांची प्रगती झाली ती धोरणेच संपविली जात असल्याचे दिसून येते. तेव्हा याविरुद्ध आपण एकत्र येऊन आवाज उचलण्याची गरज आहे.पाहुण्यांचे स्वागत अजय ढोके यांनी केले तर संचालन धम्मचारी ऋतायुष यांनी केले.जातीय अत्याचारावर आधारित पापेलिओ बुद्धाबुद्ध महोत्सवाच्या फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत पापेलिओ बुद्धा हा चित्रपट दाखविण्यात आला. केरळ येथील दलित व आदिवासी यांच्यावरील जातीय अत्याचारावर आधारित हा चित्रपट आहे. दलित आदिवासींना त्यांच्या मायभूमीतून सरकारद्वारे उद्योगपतींच्या प्रभावात कसे बेदखल केले जाते आणि शेवटी अत्याचारग्रस्त नागरिक बुद्धाचा समतेचा धम्म स्वीकारतात.जाधव सिस्टर यांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्धगुरुवारी रात्री जाधव सिस्टर यांच्या सूफी संगीताने दीक्षाभूमीवरील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. विनया आणि विजया जाधव, सुशील, अभंग, तुषार गायकवाड, सायली बलगे व अन्य कलाकारांनी एकापेक्षा एक गाणी सादर केली. नागरिकांनीही भरभरून दाद दिली.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर