शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

बुद्ध महोत्सव : आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक :सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 23:09 IST

गरिबी नागरिकाला त्याचा राजकीय स्वातंत्र्यापासून अलिप्त ठेवते. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक ठरतात तेव्हा आर्थिक समानता व सामाजिक समानता हे राजकीय लोकशाहीकरिता अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

ठळक मुद्देलोकशाही या विषयावर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरिबी नागरिकाला त्याचा राजकीय स्वातंत्र्यापासून अलिप्त ठेवते. आर्थिक लोकशाहीशिवाय राजकीय अधिकार निरर्थक ठरतात तेव्हा आर्थिक समानता व सामाजिक समानता हे राजकीय लोकशाहीकरिता अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या बुद्ध महोत्सवात गुरुवारी दुसऱ्या दिवशी रत्नावली व्याख्यानमालेंतर्गत लोकशाही या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. डॉ. थोरात म्हणाले, भारत हा सामान्य जनतेचा देश आहे, सार्वभौम आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नाही. लोकशाहीमध्येलोकनिर्वाचित प्रतिनिधींनी जनतेकरिता कार्य करण्याची अपेक्षा असते, पण तसे होताना दिसत नाही, ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे. राष्ट्र आणि धर्म हे दोन वेगवेगळे सिद्धांत आहेत आणि ते स्वतंत्रपणे कार्य करतात. राष्ट्र कल्पनेत धर्म घुसविला की राष्ट्राची महत्ता संपते. भारतीय संविधानामधे निहत मूलभूत अधिकार आणि राष्ट्राची एकता हे राष्ट्राचा पाया आहेत. याव्यतिरिक्त कोणतीही असंवैधानिक गोष्ट आणता येत नाही, परंतु आज अशा गोष्टी आणण्याचा प्रयत्न होत आहे. भारतीय लोकशाही संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले इशारे आज सत्य होताना दिसत आहेत. ज्या धोरणांमुळे मागासवर्गीय, अल्पसंख्यकांची प्रगती झाली ती धोरणेच संपविली जात असल्याचे दिसून येते. तेव्हा याविरुद्ध आपण एकत्र येऊन आवाज उचलण्याची गरज आहे.पाहुण्यांचे स्वागत अजय ढोके यांनी केले तर संचालन धम्मचारी ऋतायुष यांनी केले.जातीय अत्याचारावर आधारित पापेलिओ बुद्धाबुद्ध महोत्सवाच्या फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत पापेलिओ बुद्धा हा चित्रपट दाखविण्यात आला. केरळ येथील दलित व आदिवासी यांच्यावरील जातीय अत्याचारावर आधारित हा चित्रपट आहे. दलित आदिवासींना त्यांच्या मायभूमीतून सरकारद्वारे उद्योगपतींच्या प्रभावात कसे बेदखल केले जाते आणि शेवटी अत्याचारग्रस्त नागरिक बुद्धाचा समतेचा धम्म स्वीकारतात.जाधव सिस्टर यांनी प्रेक्षकांना केले मंत्रमुग्धगुरुवारी रात्री जाधव सिस्टर यांच्या सूफी संगीताने दीक्षाभूमीवरील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. विनया आणि विजया जाधव, सुशील, अभंग, तुषार गायकवाड, सायली बलगे व अन्य कलाकारांनी एकापेक्षा एक गाणी सादर केली. नागरिकांनीही भरभरून दाद दिली.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर