७७३ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँंड कनेक्टिव्हिटी
By Admin | Updated: June 17, 2014 00:51 IST2014-06-17T00:51:01+5:302014-06-17T00:51:01+5:30
ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील

७७३ ग्रामपंचायतींना ब्रॉडबँंड कनेक्टिव्हिटी
गणेश हूड - नागपूर
ग्रामीण भागातील जनतेला सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे केंद्र शासनाने प्रस्तावित केले आहे. याचा लाभ नागपूर जिल्ह्यातील ७७३ ग्रामपंचायतींंना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यात आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे लोकांना सक्षम सार्वजनिक सुविधा मिळण्याला मदत होणार आहे.
पंचायत संस्थांचा कारभार अधिक सक्षम व गतिमान व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींना इंटरनेटशी जोडण्यात आले आहे. परंतु सिंगल लाईन असल्याने नेटवर्क मिळत नाही. आॅनलाईन कामकाजात अडथळा येत आहे.
डाटा एन्ट्रीला स्पीड नसल्याने आॅनलाईन कामकाजाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रस्तावानुसार केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व भारत ब्रॉडब्रँड नेटवर्क लि. यांच्यात त्रिपक्षीय करार वर्षभरापूर्वीच झालेला आहे.