शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बोर्डाने सोडला सुटकेचा श्वास : शिक्षकांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 23:18 IST

अनुदानासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करावी व डीसीपीएस योजनेत अंशदानाचा वाटा वाढवावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंदोलन करीत होते. त्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या मूल्यांकनावरही बहिष्कार घातला होता. सोमवारी मिळालेल्या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बोर्डानेही सुटकेचा श्वास सोडला.

ठळक मुद्दे६ पासून सुरू होईल उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुदानासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची यादी घोषित करावी व डीसीपीएस योजनेत अंशदानाचा वाटा वाढवावा, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आंदोलन करीत होते. त्यांनी बोर्डाच्या परीक्षेच्या मूल्यांकनावरही बहिष्कार घातला होता. सोमवारी मिळालेल्या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे बोर्डानेही सुटकेचा श्वास सोडला.शिक्षकांच्या मागण्यांना घेऊन महासंघ व विज्युक्टाचे प्रतिनिधींनी शिक्षण राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, संजय शिंदे, अविनाश तळेकर, डॉ. अशोक गव्हाणकर, विलास जाधव, घोडके, मुकुंद आंधळकर हे उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या मागण्यांवर चर्चा झाली. सकारात्मक चर्चेअंती शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. सर्व शिक्षक मंगळवारपासून बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे कार्य सुरू करणार आहेत. बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी कनिष्ठ महाविद्यालयात पाठविण्यात आल्या आहेत. आंदोलनामुळे उत्तरपत्रिका कॉलेजच्या प्राचार्यांच्या ताब्यात आहेत. बोर्डाचे प्रभारी सचिव श्रीराम चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये व वेळेवर निकाल लागण्यासाठी मूल्यांकनाचे कार्य वेगाने पूर्ण करण्यात येईल.

टॅग्स :Teacherशिक्षकagitationआंदोलन