शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

...हे धाडस वाखाणण्याजोगे ! 

By श्याम बागुल | Updated: June 19, 2019 19:01 IST

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला.

 श्याम बागुललोकसभा निवडणुकीत भाजपा-सेनेच्या विरोधात लढताना अक्षरश: पालापाचोळा झालेल्या कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसने या पराभवाच्या नैराश्येच्या गर्तेत अडकून न पडता लगोलग विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही तयारी करताना दोन्ही पक्षांनी स्वतंत्र बैठका घेऊन तालुका, जिल्हाध्यक्षांकडून विधानसभानिहाय आढावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य मतदारसंघाची चाचपणीही सुरू केली आहे. दोन्ही पक्षांच्या बैठकांमध्ये एकमेकांची उणी-दुणी काढण्यात येऊन कोणी कोणत्या मतदारसंघात कसा दगाफटका केला याचे अनुभव कथन करण्याबरोबरच, सन्मानाने जागा वाटप झाल्यास आघाडी करावी अन्यथा (नसलेल्या) बळावर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचा जो काही संदेश सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.

नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा राष्टÑवादीने लढविल्या व अपेक्षेप्रमाणे त्या गमावल्यादेखील. नाशिकच्या जागेवर सलग दुसऱ्यांदा राष्टÑवादीला पराभवाचे धनी व्हावे लागले हा नवीन विक्रम या निमित्ताने पक्षाच्या खात्यावर जमा झाला. दिंडोरीच्या जागेबाबत पक्ष नाशिकपेक्षा अधिक खात्री बाळगून होता. बारामतीनंतर दिंडोरी मतदारसंघ पक्षासाठी सुरक्षित मानला जात असताना तेथेही पक्षाला जोरदार फटका बसला. अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणमीमांसा पक्ष पातळीवर होऊन अख्ख्या देशातच भल्याभल्यांची धूळधाण उडालेली असताना समीर भुजबळ काय किंवा धनराज महाले काय दोहोंचा पराभव फार विशेष नसल्याची भावना पक्ष पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांनी बाळगली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळे असेल असे सांगून कॉँगे्रस व राष्टÑवादी कॉँग्रेस अजूनही आशावादी असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे साहजिकच आहे. त्यामुळेच की काय राष्टÑवादीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पक्षाच्या पदाधिका-यांनी अजूनही पक्षाला किती व कसे अनुकूल वातावरण आहे, याचे आभासी चित्र रंगवित, जिल्ह्यातील तेरा विधानसभेच्या जागांवर दावा ठोकला आहे. हा वादा ठोकताना जणू काही विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही अशा आविर्भावात सामाजिक व राजकीय गणिते मांडून इच्छुकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. मुळात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला त्या त्या विधानसभा मतदारसंघात मिळालेली आकडेवारी ताजी असून, त्यात नजीकच्या काळात राजकीय व सामाजिक बदल होण्याची सूतराम शक्यता नाही, या वास्तवाशी एकतर पदाधिकारी असहमत असावेत किंवा ते स्वत:च स्वत:ची फसवणूक करून घेत असावेत. असाच काहीसा प्रकार जिल्हा कॉँग्रेसच्या बैठकीत घडला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान राष्ट्रवादीने विश्वासात घेतले नाही, असा सूर आळवणा-या पदाधिका-यांच्या मतदारसंघातच कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पिछाडीची मते मिळाल्याचे सोयीस्कर विसरलेल्या पदाधिका-यांनी सन्मानाने आघाडी न झाल्यास स्वबळावर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजेच पंधरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची भाषा केली आहे. मुळात गेल्या पाच वर्षांत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक जागा उमेदवाराअभावी पक्षाला लढविता आलेल्या नाहीत, पक्षाच्या ताब्यातून सत्तेची सारी सूत्रे जनतेने कधीच हिसकावून घेतलेली असून, कार्यकर्तेही पक्ष कार्यालयाकडे फिरकेनासे झालेले आहेत. अशा परिस्थितीतही कॉँग्रेस पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असेल तर त्यांचे हे धाडसदेखील वाखाणण्याजोगे आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस