शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एलआयटी युनिव्हर्सिटीच्या ‘ग्लोबल ॲल्युमनी मीट’ मध्ये नवीनता व संशोधनावर मंथन; रनायसन्स-२०२३ मध्ये पार पडले तांत्रिक सत्र

By जितेंद्र ढवळे | Updated: December 15, 2023 19:51 IST

यात तज्ज्ञांनी नवीनता व संशोधनावर मत व्यक्त केले.

नागपूर : लक्ष्मीनारायण इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) च्या जागतिक माजी विद्यार्थी मेळाव्याला (ग्लोबल ॲल्युमनी मीट : रनायसन्स - २०२३) शुक्रवारी अमरावती रोड स्थित लक्ष्मीनारायण इनोवेशन टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या परिसरात प्रारंभ झाला. आज पहिल्या दिवशी विविध कंपनी आणि संस्थांमधील तज्ज्ञांचे तांत्रिक सत्र पार पडले. यात तज्ज्ञांनी नवीनता व संशोधनावर मत व्यक्त केले.

एलआयटीला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच जागतिक माजी विद्यार्थी मेळावा असून देश-विदेशातून मोठ्या संख्येत माजी विद्यार्थी आलेले आहेत. येथे झालेल्या तांत्रिक सत्रात केमिकल अभियंता मृणाल दास, केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. एस. चंद्रशेखर, झायडेक इंडस्ट्रीचे संचालक डॉ. अजय रांका, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे डॉ. उन्नत पंडित यांनी सहभाग नोंदवला.

मृणाल दास यांनी केमिकल इंजिनिअरिंग, त्यामधील विविध रोजगार, संशोधनाच्या संधीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. देशात १९२ केमिकल कंपनी असून तिथे रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. यातील अनेक कंपन्यांमध्ये एलआयटीचे विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत असल्याबद्दल दास यांनी समाधान व्यक्त केले.

डॉ. एस. चंद्रशेखर यांनी सायलेंट जनरेशन ते अल्फा जनरेशनपर्यंतच्या विविध जनरेशनमध्ये लोकांचे सरासरी आयुर्मान आणि हॅपिनेस इंडेक्स कसा वाढत गेला याचे सादरीकरण केले.

डॉ. राजेंद्र रांका यांनी नवीनता आणण्यासाठी शिक्षण प्रक्रियेत करावयाचे बदल या विषयावर आपले विचार मांडले. ‘चलता है’ ही मानसिकता खोडून काढत नवीन पिढीला बदलाचा मार्ग स्वीकारावा लागेल. एलआयटीला जर भविष्यात हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी सारखे व्हायचे असेल तर नवीनता आणि संशोधनाची कास धरावी लागेल, कठोर मेहनत करावी लागेल, असे मत डॉ. अजय रांका यांनी व्यक्त केले. डॉ. उन्नत पंडित यांनी उच्च शिक्षण, संशोधन, पेटेंटसाठीच्या आर्थिक बाबींचा उहापोह केला.

देशात आणि नागपुरातही इनोव्हेशन लॅब आहेत. त्यातले विद्यार्थी विविध समस्यांवर समाधान शोधत आहे. एलआयटी वेळेच्या पुढे असून येथील विद्यार्थी इनोव्हेशन लॅबची आता मागणी करू शकतात, असे ते म्हणाले. वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले.

डॉ. एस. यू. मेश्राम यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. तांत्रिक सत्राला लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजू मानकर, लिटाचे अध्यक्ष माधव लाभे, डॉ. राजेश बिनिवाले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

टॅग्स :nagpurनागपूर