शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळले, भूकबळीची शक्यता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 22:53 IST

Bodies of two sisters found in closed house,नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकामठी तालुक्यात खळबळ : मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

लोकमत  न्यूज  नेटवर्क

कामठी : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्पना नागोराव लवटे (वय ५०) आणि पद्मा लवटे (६०) अशी या मृत महिलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या महिलांचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यांनी आत्महत्या केली नसल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही महिलांचे मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. त्यांचे आज, गुरुवारी शवविच्छेदन करण्यात येईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाल ओळी नंबर २ येथील लवटे यांच्या घरी कामठी नगरपरिषदेचा कर्मचारी घर कराची डिमांड पावती देण्याकरिता गेला असता घर बंद असल्याने त्याने शेजाऱ्यांना विचारणा केली. शेजाऱ्यांनी दाराच्या आतून पावती खाली टाकण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी पावती टाकण्यासाठी घराच्या आवारात शिरला गेला असता त्याला आतून दुर्गंधी आली. याबाबत त्याने शेजाऱ्यांना सांगितले. या घटनेची माहिती लगेच जुनी कामठी पोलीस ठाण्यास कळविण्यात आली. ठाणेदार विजय मालचे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लवटे यांच्या घराचे दार उघडले असता पलंगावर कल्पना लवटे व पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा लवटे या दोघीही मृतावस्थेत दिसून आल्या. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. त्यांच्या घरात खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू आढळल्या नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या महिलांच्या भगिनी बुलडाणा आणि इंदौर येथे राहतात. त्या आज, गुरुवारी कामठी येथे येतील. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.अनेक दिवसांपासून घरातच होत्या

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मा व कल्पना अविवाहित होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोघी मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करायच्या. परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी शेजारी व इतर कोणत्याही नातेवाइकांकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा शेजाऱ्यांशीही फारसा संबंध नव्हता. अनेक दिवसांपासून त्या घरातच होत्या असे शेजाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. या महिलांचा मृत्यू आजारापणामुळे झाला असावा. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. या दोन्ही महिला बऱ्याच दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नव्हत्या, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.- विजय मालचे, ठाणेदार, जुनी कामठी पोलीस ठाणे

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर