शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळले, भूकबळीची शक्यता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 22:53 IST

Bodies of two sisters found in closed house,नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकामठी तालुक्यात खळबळ : मृत्यूचे कारण गुलदस्त्यात

लोकमत  न्यूज  नेटवर्क

कामठी : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्पना नागोराव लवटे (वय ५०) आणि पद्मा लवटे (६०) अशी या मृत महिलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या महिलांचा मृत्यू उपासमारीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यांनी आत्महत्या केली नसल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दोन्ही महिलांचे मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. त्यांचे आज, गुरुवारी शवविच्छेदन करण्यात येईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाल ओळी नंबर २ येथील लवटे यांच्या घरी कामठी नगरपरिषदेचा कर्मचारी घर कराची डिमांड पावती देण्याकरिता गेला असता घर बंद असल्याने त्याने शेजाऱ्यांना विचारणा केली. शेजाऱ्यांनी दाराच्या आतून पावती खाली टाकण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी पावती टाकण्यासाठी घराच्या आवारात शिरला गेला असता त्याला आतून दुर्गंधी आली. याबाबत त्याने शेजाऱ्यांना सांगितले. या घटनेची माहिती लगेच जुनी कामठी पोलीस ठाण्यास कळविण्यात आली. ठाणेदार विजय मालचे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लवटे यांच्या घराचे दार उघडले असता पलंगावर कल्पना लवटे व पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा लवटे या दोघीही मृतावस्थेत दिसून आल्या. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले. त्यांच्या घरात खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू आढळल्या नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या महिलांच्या भगिनी बुलडाणा आणि इंदौर येथे राहतात. त्या आज, गुरुवारी कामठी येथे येतील. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.अनेक दिवसांपासून घरातच होत्या

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पद्मा व कल्पना अविवाहित होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोघी मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करायच्या. परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी शेजारी व इतर कोणत्याही नातेवाइकांकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा शेजाऱ्यांशीही फारसा संबंध नव्हता. अनेक दिवसांपासून त्या घरातच होत्या असे शेजाऱ्यांनी सांगितले.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. या महिलांचा मृत्यू आजारापणामुळे झाला असावा. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. या दोन्ही महिला बऱ्याच दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नव्हत्या, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे.- विजय मालचे, ठाणेदार, जुनी कामठी पोलीस ठाणे

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर