शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

धावत्या ट्रेनमध्ये चढणे जिवावर बेतले; मुलींदेखत महिलेवर काळाची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2023 22:01 IST

Nagpur News बंगळुरू येथून पतीचा निरोप घेऊन दोन मुलींसह बिहारकडे निघालेल्या एका महिलेवर काळाने झडप घातली. येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर मंगळवारी सकाळी १०:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

ठळक मुद्देदोन्ही मुलींची प्रकृती बिघडली

नागपूर : बंगळुरू येथून पतीचा निरोप घेऊन दोन मुलींसह बिहारकडे निघालेल्या एका महिलेवर काळाने झडप घातली. येथील रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर मंगळवारी सकाळी १०:१५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

गायत्री स्वामी विवेकानंद पांडे (४५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होत्या. गायत्री यांचे पती बंगळुरू येथे स्टेट बँकेत नोकरी करतात. त्यांना दोन मुली आहेत. या मुलींसह गायत्री त्यांच्या पतीकडे काही दिवसांपासून मुक्कामी होत्या. गावाला परत जाण्यासाठी त्या ट्रेन क्रमांक ०६५०९ बंगळुरू दानापूर हमसफर एक्स्प्रेसमध्ये बसल्या. गायत्री यांच्या दोन मुलीही सोबत होत्या. नागपूर स्थानकावर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही गाडी आली. मुलींना नाश्ता खरेदी करण्यासाठी गायत्री फलाट क्रमांक एकवर उतरल्या. सकाळी १०:१५ च्या सुमारास ही गाडी पुढे जायला निघाली. त्यामुळे घाईगडबडीत गायत्री यांनी गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दाराची कडी (हॅण्डल) पकडली असतानाच रेल्वेगाडीने वेग धरल्यामुळे रेल्वेचा डबा आणि फलाटाच्या फटीत पांडे यांचे दोन्ही पाय आल्याने त्या चिरडत गेल्या. या थरारक अपघाताने अनेकांच्या अंगावर शहारे आले. डोळ्यादेखत आई रेल्वेगाडीखाली चिरडली गेल्याने पांडे यांच्या दोन्ही मुलींवर जोरदार मानसिक आघात झाला. त्या आक्रोश करू लागल्या.

प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वेगाडी थांबवली. त्यानंतर पांडे यांचा मृतदेह काढून तो मेयोत पाठविण्यात आला. या घटनेची सूचना पांडे यांच्या पतीला देण्यात आली. ते विमानाने दुपारी नागपुरात पोहोचले. त्यानंतर सायंकाळी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पांडे ॲम्ब्युलन्सने नालंदाकडे रवाना झाले.

विलंबाने केला घात

अनेक प्रवासी रेल्वेगाडी सुटेपर्यंत फलाटावर थांबतात आणि गाडी सुटल्यानंतर धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतात. यात काही क्षणांचा जरी विलंब झाला तर तो जीवघेणा ठरतो. गायत्री पांडे यांच्या बाबतीतही असेच झाले. गाडी सुटली अन् ती पकडण्यासाठी त्या धावू लागल्या. मात्र, त्यांचे वजन काहीसे जास्त असल्याने त्यांचा श्वास भरून आला. अशातही त्यांनी गाडीच्या दाराची कडी पकडली अन् त्यांचा घात झाला.

-----

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू