शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

असह्य उकाड्यात राज्यावर वीज संकटाची काळी छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 08:10 IST

चार केंद्रांमध्ये कोळसा संकट, रेल्वेच्या मंद गतीचा बसला फटका

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तापमान वाढताच पुन्हा राज्यात वीज संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. कोळशाच्या पुरेशा पुरवठ्यानंतरही चार वीज केंद्रांना कोळशाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. सूत्रानुसार ऊन वाढताच या चारही वीज केंद्रातील उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. हे संकट सोडविण्यासाठी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत बैठका सुरू आहेत. 

गेल्यावर्षीही याच काळात केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागला. आता कोळशाचा साठा १६ लाख मेट्रिक टन आहे. मात्र वाहतूक समस्येमुळे कोळसा फक्त कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर या केंद्रांवरच उपलब्ध होत आहे. नाशिक, भुसावळ,  पारस व परळी येथे कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत पोहोचला आहे.  

तब्बल २० तासांचा उशीरnमहानिर्मितीच्या मते, मध्य रेल्वेतर्फे बडनेराजवळ थर्ड लाइन तयार केली जात आहे. अन्य विकास कामेही सुरू आहेत. यामुळे कोळशाची वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे. nया गाड्या १३ ते २० तास उशिरा पोहोचत आहेत. रेल्वेच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. ब्लॉक घेऊन दुरुस्तीची कामे सुरू असल्याने रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे. 

किती दिवस पुरेल कोळसा साठा? वीज केंद्र        दिवसखापरखेडा    २२ चंद्रपूर    १४ कोराडी    १२नाशिक    ०४ भुसावळ    ०१ पारस    २परळी    ३.५

बैठकांचे सत्र, दिल्लीत मंथन  कोळसा वाहतूक संकटाबाबत शनिवारी सुटी असतानाही दिल्लीत  उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये कोळसा, रेल्वे व  ऊर्जा मंत्रालयातील  वरिष्ठ अधिकाऱ्यांसह  महानिर्मिती व  कोल इंडियाचे  प्रतिनिधी सहभागी झाले.   महानिर्मितीचे संचालक  (खनिकर्म) राजेश पाटील म्हणाले,  शुक्रवारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. सर्व विभागांशी समन्वय साधून संकट दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

विदर्भाच्या भरवशावर राज्यात उजेडराज्यात २८ ते २९ हजार मेगावॅट असलेली विजेची मागणी वळवाच्या पावसामुळे कमी होऊन २३ हजार मेगावॅटवर आली. मात्र, तापमान वाढताच मागणी वाढून अडचणी येऊ शकतात. सद्यस्थितीत भुसावळ, नाशिकचे एक-एक युनिट बंद आहे. विदर्भातील कोराडी, खापरखेडा व  चंद्रपूर वीज केंद्रातूूून सुमारे ६५ टक्के वीज महाराष्ट्राला मिळत आहे. अदानीच्या तिरोडा केंद्रातून  ३०८५ मेगावॅट व एनटीपीसीमधून ४३७५ मेगावॅट वीज मिळते.

टॅग्स :nagpurनागपूरSun strokeउष्माघात