शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

असह्य उकाड्यात राज्यावर वीज संकटाची काळी छाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 08:10 IST

चार केंद्रांमध्ये कोळसा संकट, रेल्वेच्या मंद गतीचा बसला फटका

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तापमान वाढताच पुन्हा राज्यात वीज संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. कोळशाच्या पुरेशा पुरवठ्यानंतरही चार वीज केंद्रांना कोळशाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. सूत्रानुसार ऊन वाढताच या चारही वीज केंद्रातील उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. हे संकट सोडविण्यासाठी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत बैठका सुरू आहेत. 

गेल्यावर्षीही याच काळात केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागला. आता कोळशाचा साठा १६ लाख मेट्रिक टन आहे. मात्र वाहतूक समस्येमुळे कोळसा फक्त कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर या केंद्रांवरच उपलब्ध होत आहे. नाशिक, भुसावळ,  पारस व परळी येथे कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत पोहोचला आहे.  

तब्बल २० तासांचा उशीरnमहानिर्मितीच्या मते, मध्य रेल्वेतर्फे बडनेराजवळ थर्ड लाइन तयार केली जात आहे. अन्य विकास कामेही सुरू आहेत. यामुळे कोळशाची वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे. nया गाड्या १३ ते २० तास उशिरा पोहोचत आहेत. रेल्वेच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. ब्लॉक घेऊन दुरुस्तीची कामे सुरू असल्याने रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे. 

किती दिवस पुरेल कोळसा साठा? वीज केंद्र        दिवसखापरखेडा    २२ चंद्रपूर    १४ कोराडी    १२नाशिक    ०४ भुसावळ    ०१ पारस    २परळी    ३.५

बैठकांचे सत्र, दिल्लीत मंथन  कोळसा वाहतूक संकटाबाबत शनिवारी सुटी असतानाही दिल्लीत  उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये कोळसा, रेल्वे व  ऊर्जा मंत्रालयातील  वरिष्ठ अधिकाऱ्यांसह  महानिर्मिती व  कोल इंडियाचे  प्रतिनिधी सहभागी झाले.   महानिर्मितीचे संचालक  (खनिकर्म) राजेश पाटील म्हणाले,  शुक्रवारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. सर्व विभागांशी समन्वय साधून संकट दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

विदर्भाच्या भरवशावर राज्यात उजेडराज्यात २८ ते २९ हजार मेगावॅट असलेली विजेची मागणी वळवाच्या पावसामुळे कमी होऊन २३ हजार मेगावॅटवर आली. मात्र, तापमान वाढताच मागणी वाढून अडचणी येऊ शकतात. सद्यस्थितीत भुसावळ, नाशिकचे एक-एक युनिट बंद आहे. विदर्भातील कोराडी, खापरखेडा व  चंद्रपूर वीज केंद्रातूूून सुमारे ६५ टक्के वीज महाराष्ट्राला मिळत आहे. अदानीच्या तिरोडा केंद्रातून  ३०८५ मेगावॅट व एनटीपीसीमधून ४३७५ मेगावॅट वीज मिळते.

टॅग्स :nagpurनागपूरSun strokeउष्माघात