शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

संत्र्यावर काळी माशी, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:03 IST

दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.

ठळक मुद्देअमरावती व नागपूर जिल्हा ग्रस्त : संत्रा उत्पादकांना आयसीएआर-सीसीआरआयचा अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.हा आजार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील रासेगाव, नायगाव, बोर्डी, चमक, बोपापूर, हरम, टवलार, येवता तसेच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील निमजी, मोहपा या गावांमध्ये संत्र्याच्या झाडावर दिसून आला आहे. या आजारासंदर्भात लदानिया म्हणाले की, यावर्षी निसर्गाचा असमतोल दिसून येत आहे. संततधार पाऊस झाल्यानंतर कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण संत्रा पिकासाठी प्रतिकूल आहे. आता झाडांना नवीन पाने येत आहे. ज्यामुळे काळी माशी आणि पांढरी माशी यासारख्या रस शोषण करणाऱ्या कीटकांना अंडी देण्याकरिता अनुकूल आहे. काळया माशीच्या उपद्रवामुळे पानावरती सुटी मोल्ड या बुरशीची (कोळशी) वाढ झालेली आढळून आली आहे. ही बुरशी संपूर्ण पानांना वेढा घालत आहे.फवारणीची योग्य वेळझाडांचे सर्वेक्षण केल्यानुसार मिळालेल्या नमुन्यात ५० टक्के अंडी फुटलेली असल्याचे लक्षात आले आहे. ही वेळ कीटकनाशकांची फवारणी करण्याकरिता योग्य वेळ आहे. या काळया व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी त्यांना मारणे आवश्यक आहे. त्यासाठी इमिडाक्लोप्रीड,अ‍ॅसिफीट किंवा डायमिथोएट या बुरशीनाशकांची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करणे गरजेचे आहे. सुटी मोल्ड या बुरशीसाठी कॉपर आॅक्सिक्लोराईड अशी बुरशीनाशक फवारण्याचा सल्ला संशोधन केंद्रातर्फे देण्यात आला आहे. नुकसान कमी होईलकाळी माशी, पांढरी माशी या रोगामुळे झाडे काळे पडतील, त्याचा परिणाम संत्रा पिकावर होईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटेल, भावसुद्धा मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आताच काळजी घेणे गरजेचे आहे.एम.एस. लदानिया,संचालक आयसीसीआर

टॅग्स :fruitsफळेnagpurनागपूर