शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

संत्र्यावर काळी माशी, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:03 IST

दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.

ठळक मुद्देअमरावती व नागपूर जिल्हा ग्रस्त : संत्रा उत्पादकांना आयसीएआर-सीसीआरआयचा अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अलर्ट केले आहे. लगेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक एम.एस. लदानिया यांनी दिले आहे.हा आजार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील रासेगाव, नायगाव, बोर्डी, चमक, बोपापूर, हरम, टवलार, येवता तसेच नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील निमजी, मोहपा या गावांमध्ये संत्र्याच्या झाडावर दिसून आला आहे. या आजारासंदर्भात लदानिया म्हणाले की, यावर्षी निसर्गाचा असमतोल दिसून येत आहे. संततधार पाऊस झाल्यानंतर कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण संत्रा पिकासाठी प्रतिकूल आहे. आता झाडांना नवीन पाने येत आहे. ज्यामुळे काळी माशी आणि पांढरी माशी यासारख्या रस शोषण करणाऱ्या कीटकांना अंडी देण्याकरिता अनुकूल आहे. काळया माशीच्या उपद्रवामुळे पानावरती सुटी मोल्ड या बुरशीची (कोळशी) वाढ झालेली आढळून आली आहे. ही बुरशी संपूर्ण पानांना वेढा घालत आहे.फवारणीची योग्य वेळझाडांचे सर्वेक्षण केल्यानुसार मिळालेल्या नमुन्यात ५० टक्के अंडी फुटलेली असल्याचे लक्षात आले आहे. ही वेळ कीटकनाशकांची फवारणी करण्याकरिता योग्य वेळ आहे. या काळया व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी त्यांना मारणे आवश्यक आहे. त्यासाठी इमिडाक्लोप्रीड,अ‍ॅसिफीट किंवा डायमिथोएट या बुरशीनाशकांची १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करणे गरजेचे आहे. सुटी मोल्ड या बुरशीसाठी कॉपर आॅक्सिक्लोराईड अशी बुरशीनाशक फवारण्याचा सल्ला संशोधन केंद्रातर्फे देण्यात आला आहे. नुकसान कमी होईलकाळी माशी, पांढरी माशी या रोगामुळे झाडे काळे पडतील, त्याचा परिणाम संत्रा पिकावर होईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न घटेल, भावसुद्धा मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आताच काळजी घेणे गरजेचे आहे.एम.एस. लदानिया,संचालक आयसीसीआर

टॅग्स :fruitsफळेnagpurनागपूर