शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

काला यानि अंधेरा : तुझे असणे घातक! नसणे व्यापक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:14 IST

‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला.

ठळक मुद्देकुणी तरी कलेचे मर्म समजून घ्या हो२१वा भारत रंग महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला. पुन्हा शून्यातून पूर्णत्वापर्यंतच्या प्रवासात पडलेले तुकडे एक एक जुळत गेले आणि तो चंद्र पूर्ण झाला म्हणून पौर्णिमा... हा चंद्राचा प्रवास म्हणजे कलावंत! तो तिळतिळ तुटतो, जुळतो आणि आपल्या प्रतिभेच्या उजेडात अव्यक्त भावनांना उजागर करतो. त्याची ही उजागरता कुणाला तरी साधन ठरते आणि केवळ स्वार्थापोटी त्याला दडपल्या जाते. हाच गाभा ‘काला यानि अंधेरा’ या हिंदीनाटकातून व्यक्त करण्यात आला.राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने प्रथमच नागपुरात २१व्या भारत रंग महोत्सवाचा समांतर नाट्यमहोत्सव साई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्याच महोत्सवात मंगळवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील इंडी प्रॉडक्शन्सतर्फे परेश व्यास लिखित व कबीर ठाकोर दिग्दर्शित ‘काला यानि अंधेरा’ हे हिंदीनाटक सादर झाले. महोत्सवाचे समन्वयक डॉ. विनोद इंदूरकर व ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर यांच्या हस्ते नाट्यकलावंतांचा सत्कार करण्यात आला.नाटकाची कथा विनय सुभाष केलकर रंगसंगतीलाच जीवन मानणाऱ्या चित्रकार प्राध्यापकाच्या कलाभावनेच्या अनुषंगाने गुंफण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांच्या चित्रावरून उडालेला गदारोळ आणि २००७मध्ये अहमदाबादमधील चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेच्या प्राध्यापकाच्या खुनाचा संदर्भातून या कथेचे कथासूत्र मांडण्यात आले आहे. कला ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि कलावंत रंगरेषाच्या माध्यमातून स्वत:ची कला आविष्कृत करतो. रंगाचा प्रत्येक थेंब आणि पेन्सिलीने कोरलेली प्रत्येक रेषा, त्याच्या भावनेचे तार असतात.त्यात श्लील-अश्लील असे काही नसते. भावनेचे राजकारण होते, ही बाब कलेच्या प्रांतात बुडालेल्या कलावंताला ठाऊक नाही आणि राजकारणी कशा तऱ्हेने त्याचा उपहास करतात हाच भाव या नाट्यकृतीतून सादर होतो. कृष्णन हा केलकर यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रकलेल्या प्रांतात उडी घेण्यास आसुसलेला विद्यार्थी तर त्याचाच मित्र असलेला राजू शाह याला कलेचे मोल नाही. मात्र, अंतिम सादरीकरणाची वेळ आली आहे आणि त्यात तो मागे पडतो. त्यामुळे केलकर त्याचा टोचून बोलतात आणि काळा रंग भेट देऊन मोकळे होतात. हा अपमान समजून राजू अनावधनाने राजकीय व्यक्तीला सांगून अपमानाचा बदला घेतो. मात्र, त्याच वेळी झालेला कलेचा अपमान राजूच्याही जिव्हारी लागतो आणि या घटनेमुळे कलेचा महर्षी व महर्षी होण्याच्या वाटेवर असलेल्या दोन व्यक्ती अज्ञातवासात जातात. या दोघांचा शोध आणि सामाजिक वास्तवाचे संदर्भ यातून फुलले आहे. नाटकाची गती, संवाद लेखन आणि अभिनेत्यांची अदायगी अप्रतिम असल्याने, प्रत्येक फॉर्मेशन्स आणि संवादाला टाळ्यांचा गडगडाट होत होता, हेच या नाटकाचे यश म्हणावे लागेल. नाटकात विशाल शाह, शिवम पारेख, कबिर ठाकरे, दीप पटेल, पुजा पुरोहित, कैलाश शहदादपुरी, प्रशांत जांगीड, निलय गोराडिया, तुषार शर्मा, सुरज नायक, जीत पटेल, श्रुहद गोस्वामी, राधिक बुधभट्टी, अनिकेत परमार, यश वरण, नेहा शाह, आदित्य त्रिवेदी व परेश व्यास यांच्या भूमिका होत्या. संगीत सूरज नायक व सौरभ जोशी, प्रकाशयोजना जीत पटेल व भव्य दोषी यांचे होते.

 

टॅग्स :Natakनाटकhindiहिंदी