शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

काला यानि अंधेरा : तुझे असणे घातक! नसणे व्यापक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:14 IST

‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला.

ठळक मुद्देकुणी तरी कलेचे मर्म समजून घ्या हो२१वा भारत रंग महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तुम आऐ तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला’ पण, तो चंद्र कसा निघाला. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचे तुकडे पडत गेले आणि नाहीसा झाला, शून्य झाला. पुन्हा शून्यातून पूर्णत्वापर्यंतच्या प्रवासात पडलेले तुकडे एक एक जुळत गेले आणि तो चंद्र पूर्ण झाला म्हणून पौर्णिमा... हा चंद्राचा प्रवास म्हणजे कलावंत! तो तिळतिळ तुटतो, जुळतो आणि आपल्या प्रतिभेच्या उजेडात अव्यक्त भावनांना उजागर करतो. त्याची ही उजागरता कुणाला तरी साधन ठरते आणि केवळ स्वार्थापोटी त्याला दडपल्या जाते. हाच गाभा ‘काला यानि अंधेरा’ या हिंदीनाटकातून व्यक्त करण्यात आला.राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीने प्रथमच नागपुरात २१व्या भारत रंग महोत्सवाचा समांतर नाट्यमहोत्सव साई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. त्याच महोत्सवात मंगळवारी गुजरातच्या अहमदाबाद येथील इंडी प्रॉडक्शन्सतर्फे परेश व्यास लिखित व कबीर ठाकोर दिग्दर्शित ‘काला यानि अंधेरा’ हे हिंदीनाटक सादर झाले. महोत्सवाचे समन्वयक डॉ. विनोद इंदूरकर व ज्येष्ठ रंगकर्मी अनिल चनाखेकर यांच्या हस्ते नाट्यकलावंतांचा सत्कार करण्यात आला.नाटकाची कथा विनय सुभाष केलकर रंगसंगतीलाच जीवन मानणाऱ्या चित्रकार प्राध्यापकाच्या कलाभावनेच्या अनुषंगाने गुंफण्यात आली आहे. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांच्या चित्रावरून उडालेला गदारोळ आणि २००७मध्ये अहमदाबादमधील चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेच्या प्राध्यापकाच्या खुनाचा संदर्भातून या कथेचे कथासूत्र मांडण्यात आले आहे. कला ही जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि कलावंत रंगरेषाच्या माध्यमातून स्वत:ची कला आविष्कृत करतो. रंगाचा प्रत्येक थेंब आणि पेन्सिलीने कोरलेली प्रत्येक रेषा, त्याच्या भावनेचे तार असतात.त्यात श्लील-अश्लील असे काही नसते. भावनेचे राजकारण होते, ही बाब कलेच्या प्रांतात बुडालेल्या कलावंताला ठाऊक नाही आणि राजकारणी कशा तऱ्हेने त्याचा उपहास करतात हाच भाव या नाट्यकृतीतून सादर होतो. कृष्णन हा केलकर यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रकलेल्या प्रांतात उडी घेण्यास आसुसलेला विद्यार्थी तर त्याचाच मित्र असलेला राजू शाह याला कलेचे मोल नाही. मात्र, अंतिम सादरीकरणाची वेळ आली आहे आणि त्यात तो मागे पडतो. त्यामुळे केलकर त्याचा टोचून बोलतात आणि काळा रंग भेट देऊन मोकळे होतात. हा अपमान समजून राजू अनावधनाने राजकीय व्यक्तीला सांगून अपमानाचा बदला घेतो. मात्र, त्याच वेळी झालेला कलेचा अपमान राजूच्याही जिव्हारी लागतो आणि या घटनेमुळे कलेचा महर्षी व महर्षी होण्याच्या वाटेवर असलेल्या दोन व्यक्ती अज्ञातवासात जातात. या दोघांचा शोध आणि सामाजिक वास्तवाचे संदर्भ यातून फुलले आहे. नाटकाची गती, संवाद लेखन आणि अभिनेत्यांची अदायगी अप्रतिम असल्याने, प्रत्येक फॉर्मेशन्स आणि संवादाला टाळ्यांचा गडगडाट होत होता, हेच या नाटकाचे यश म्हणावे लागेल. नाटकात विशाल शाह, शिवम पारेख, कबिर ठाकरे, दीप पटेल, पुजा पुरोहित, कैलाश शहदादपुरी, प्रशांत जांगीड, निलय गोराडिया, तुषार शर्मा, सुरज नायक, जीत पटेल, श्रुहद गोस्वामी, राधिक बुधभट्टी, अनिकेत परमार, यश वरण, नेहा शाह, आदित्य त्रिवेदी व परेश व्यास यांच्या भूमिका होत्या. संगीत सूरज नायक व सौरभ जोशी, प्रकाशयोजना जीत पटेल व भव्य दोषी यांचे होते.

 

टॅग्स :Natakनाटकhindiहिंदी