शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ट्रेन गुजरातला मेळावा संपताना पोहोचली मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:58 IST

भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी तीन हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून दोन विशेष रेल्वे निघाल्या. मात्र, दोन्ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आल्या. या विलंबामुळे पहिली रेल्वे दुपारी दीडच्या सुमारास तर दुसरी दुपारी ३ च्या सुमारास बांद्रा येथे पोहोचली. तेथून नेते व कार्यकर्त्यांना बेस्टच्या बसद्वारे बांद्रा कुर्ला येथील कार्यक्रमस्थळी पोहचविण्यात आले. मात्र, तोवर मेळावा समारोपाला आला होता. यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

ठळक मुद्दे सूरत, वलसाडमार्गे दुपारी २ वाजता बांद्र्यात दाखल : बेस्टच्या बसेसने पोहचविले कार्यक्रम स्थळी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईत आयोजित महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी तीन हजारावर कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी नागपुरातून दोन विशेष रेल्वे निघाल्या. मात्र, दोन्ही रेल्वे थेट मुंबईला न पोहोचता गुजरातमार्गे वळविण्यात आल्या. या विलंबामुळे पहिली रेल्वे दुपारी दीडच्या सुमारास तर दुसरी दुपारी ३ च्या सुमारास बांद्रा येथे पोहोचली. तेथून नेते व कार्यकर्त्यांना बेस्टच्या बसद्वारे बांद्रा कुर्ला येथील कार्यक्रमस्थळी पोहचविण्यात आले. मात्र, तोवर मेळावा समारोपाला आला होता. यामुळे कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.नागपूरहून गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन्ही विशेष रेल्वे सुटल्या. दोन्ही गाड्या कार्यकर्त्यांनी फुल्ल होती. पहिल्या रेलेव्त नागपूर शहरातील तर दुसऱ्या रेल्वेत नागपूर ग्रामीणमधील पदाधिकारी व कार्यकर्ते होते. शहरातील गाडीत भाजपाचे आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी महापौर प्रवीण दटके, अर्चना डेहनकर, डॉ. किर्तीदा अजमेरा, संदीप जाधव, श्रीकांत देशपांडे यांच्यासह बहुतांश नगरसेवक, नगरसेविका व त्यांचे पतीही या गाडीत होते. नागपूरहून मुंबईला पोहचण्यासाठी साधारणत: १४ ते १५ तास लागतात. त्यामुळे ही गाडी सकाळी ७ पर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. पदाधिकारी व कार्यकर्ते तशा चर्चांमध्ये रंगले होते. मात्र, ही गाडी गुजरातमार्गे वळविण्यात आल्याचे पहाटे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.मनमाडवरून नंदूरबार मार्गे ही गाडी वळविण्यात आली असून ती आता सूरत, वलसाड मार्गे मुंबईला पोहचेल, अशी माहिती कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा भडका उडाला. सकाळी ९.५० वाजता गाडी वलसाड येथे पोहचली. येथे भाजप नेत्यांची रेल्वे अधिकाºयांशी बाचाबाची झाली. नियमित गाड्यांसाठी रेल्वे रूट व्यस्त असल्यामुळे गुजरातमार्गे ही विशेष गाडी वळविण्यात आल्याचे रेल्वे अधिकाºयांनी स्पष्ट केले. ग्रामीणची गाडी तर सकाळी ११.३० च्या सुमारास वलसाड येथे पोहचली. वांद्रा येथे पोहचयाला या गाडीला ३ वाजले. तोवर कार्यक्रम संपला होता. प्रवासात ग्रामीणच्या कार्यकर्त्यांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेत्यांवर नाराजीही व्यक्त केली.नागपुरातून सुमारे दोन हजार कार्यकर्त्यांसाठी गुरुवारी विशेष रेल्वेगाडी ‘बुक’ करण्यात आली होती. रेल्वेतर्फे तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र भाजपतर्फे कार्यकर्त्यांना सकाळी १० ची वेळ सांगण्यात आली. फक्त कार्यकर्ते घेऊन विशेष रेल्वेगाडी ८.१५ वाजता नागपूरहून रवाना झाली. भाजप पदाधिकाºयांनी वरिष्ठ पातळीवर संपर्क करुन हा गोंधळ कळविला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती नागपुरात बोलविली. ही दुपारी ३.२४ वाजता गाडी मुंबईकडे रवाना झाली होती. एवढे सर्व होऊनही गाडी गुजरातला वळविल्याने कार्यकर्त्यांना मुंबईत पोहचायला ८ ते ९ तासांचा विलंब झाला. यामुळे मेळाव्याच्या शुभारंभाला पोहचण्याच्या आशेने निघालेले कार्यकर्ते समारोपालाच पोहचले.हेतूपूरस्सर रेल्वे वळवली : भाजपाचा आरोप- गुरुवारी दुपारी मुंबईसाठी निघालेली विशेष रेल्वेगाडी कारण नसताना गुजरातच्या ट्रॅकशी जोडण्यात आली. ही गाडी सकाळी ९.५० वाजता वलसाड येथे पोहोचली.रेल्वेचे अधिकारी लालफितशाहीच्या मानसिकतेतून अद्याप बाहेर आलेली नाही. भाजपाचे कार्यकर्ते वेळेवर मुंबईत पोहचू नये या उद्देशाने रेल्वेने हेतूपूरस्सर ही रेल्वे गुजरातला वळविल्याचा आरोप भाजपाचे प्रसिद्ध प्रमुख चंदन गोस्वामी यांनी केला.

टॅग्स :BJP rally in Mumbaiभाजपाचा महामेळावा 2018Railway Passengerरेल्वे प्रवासी