शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 उत्तरप्रदेशात भाजपची ‘सत्तावापसी’ कठीणच; तोगडियांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 21:42 IST

Nagpur News उत्तर प्रदेशमधील शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्यात नाराजीची भावना आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांत भारतीय जनता पक्षासाठी सत्तेत परतणे कठीण असेल, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर : उत्तर प्रदेशमधील शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्यात नाराजीची भावना आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला नुकसान होईल व त्यांच्यासाठी सत्तेत परतणे कठीण असेल, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी नागपुरात आले असताना प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेले वातावरण, तसेच शेतकरी उत्पादनात हमीभाव दिला नाही. केंद्रानेदेखील कुठलीही पावले उचलली नाहीत, याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. युक्रेन-रशिया युद्धात भारताने तटस्थ राहण्याची योग्य भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारी रोजीच युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्याची आवश्यकता होती. मात्र विलंब केल्यामुळे एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. उणे १० अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत असून ही निंदनीय बाब आहे, असे तोगडिया म्हणाले.

विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालये का नाहीत ?

वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणात महाविद्यालये नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेरील देशांत जावे लागते. हे केंद्र शासनाचे अपयशच आहे. एकीकडे आपण विश्वगुरू बनण्याच्या गोष्टी करतो. मग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक संख्येत महाविद्यालये का नाहीत? असा सवाल डॉ. तोगडिया यांनी उपस्थित केला. देशात वैद्यकीय शिक्षण प्रचंड महाग असल्याने रिक्त जागा असूनदेखील विद्यार्थी बाहेर जातात. ४५ वर्षांअगोदर मी एमबीबीएस केले तेव्हा पंधराशे रुपये वार्षिक शुल्क होते. आता विद्यार्थ्यांना ७५ लाख ते एक कोटी द्यावे लागतात. यावर केंद्राने विचार करावा, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडिया