शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

 उत्तरप्रदेशात भाजपची ‘सत्तावापसी’ कठीणच; तोगडियांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 21:42 IST

Nagpur News उत्तर प्रदेशमधील शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्यात नाराजीची भावना आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांत भारतीय जनता पक्षासाठी सत्तेत परतणे कठीण असेल, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.

नागपूर : उत्तर प्रदेशमधील शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्यात नाराजीची भावना आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला नुकसान होईल व त्यांच्यासाठी सत्तेत परतणे कठीण असेल, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे. बुधवारी नागपुरात आले असताना प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेले वातावरण, तसेच शेतकरी उत्पादनात हमीभाव दिला नाही. केंद्रानेदेखील कुठलीही पावले उचलली नाहीत, याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. युक्रेन-रशिया युद्धात भारताने तटस्थ राहण्याची योग्य भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारी रोजीच युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्याची आवश्यकता होती. मात्र विलंब केल्यामुळे एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. उणे १० अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत असून ही निंदनीय बाब आहे, असे तोगडिया म्हणाले.

विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालये का नाहीत ?

वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक प्रमाणात महाविद्यालये नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेरील देशांत जावे लागते. हे केंद्र शासनाचे अपयशच आहे. एकीकडे आपण विश्वगुरू बनण्याच्या गोष्टी करतो. मग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक संख्येत महाविद्यालये का नाहीत? असा सवाल डॉ. तोगडिया यांनी उपस्थित केला. देशात वैद्यकीय शिक्षण प्रचंड महाग असल्याने रिक्त जागा असूनदेखील विद्यार्थी बाहेर जातात. ४५ वर्षांअगोदर मी एमबीबीएस केले तेव्हा पंधराशे रुपये वार्षिक शुल्क होते. आता विद्यार्थ्यांना ७५ लाख ते एक कोटी द्यावे लागतात. यावर केंद्राने विचार करावा, असेदेखील ते म्हणाले.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडिया