मनपावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा फडक वणार
By Admin | Updated: April 7, 2016 03:06 IST2016-04-07T03:06:18+5:302016-04-07T03:06:18+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत.

मनपावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा फडक वणार
वर्धापनदिनाला संकल्प : शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. या योजना सर्वसामान्यार्पंत पोहोचवून महापालिकेवर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा फडकावण्याचा संकल्प बुधवारी करण्यात आला.
भाजपच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने टिळक पुतळा येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. गिरीश व्यास, प्रदेश महामंत्री रामदास आंबटकर, महापालिके तील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी आदी उपस्थित होते.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेले सामाजिक कार्य, त्यांचा त्याग व बलिदान यातून आज केंद्र व राज्यात बहुमताचे सरकार स्थापन करण्यात यश आले आहे. कोणत्याही पदाची आशा न करता पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या शिस्तबद्ध प्रयत्नामुळे हे यश मिळाल्याचे प्रतिपादन बनवारीलाल पुरोहित यांनी यावेळी केले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जनकल्याणाच्या अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधावा, असे आवाहन सुधाकर कोहळे यांनी केले.
यावेळी जमाल सिद्दीकी, श्रीकांत देशपांडे, रमेश मानकर, राजेश बागडी, किशोर पालांदूरकर, भोजराज डुम्बे, अर्चना डेहनकर, अशोक धोटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन संदीप जाधव यांनी तर आभार किशोर पालांदूरकर यांनी मानले. शहरातील सर्व ७२ प्रभागात ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एका दिवसात भाजप ५० हजार कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)