शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

भाजपला संविधान बदलायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: September 22, 2023 15:33 IST

नागपूरमार्गे छिंदवाड्यासाठी रवाना

नागपूर : देशाचे संविधान प्रत्येकाला न्याय व अधिकार देणारे आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. हे आपल्याला बदलू द्यायचे नाही. ही लढाई फार मोठी आहे. देशात परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत, असे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मध्यप्रदेशात छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आदित्य ठाकरे हे शुक्रवारी सकाळी नागपूरमार्गे रवाना झाले. यावेळी सावनेर येथे बाजार समिती यार्डमध्येे आयोजित बैठकीला त्यांनी संबोधित केले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, इंडिया, भारत, हिंदुस्थान ही नावे वेगवेगळी असली तरी आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत. या देशाची लोकशाही टीकवायची आहे. पण आज देशात लोकशाही उरलेली नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात दीड वर्षांपासून घटनाबाह्य सरकार बसले आहे. होर्डींग, बॅनर व प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. पण दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. वारकरी, महिला, मराठा समाजावर लाठीचार होत आहे. गणपतीच्या मिरवणुकीत एका आमदाराने फायरिंग केली. पण कारवाई झाली नाही, असा कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अध्यक्षांची भूमिका न्याय देणारी असावी

- ४० आमदारांचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे न्याय देणारी असली पाहिजे, असे आदित्य ठाकरे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मध्यप्रदेशात शिवसेना निवडणुका लढविणार का, या प्रश्नावर याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे हे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहे. पण सरकारकडून काही होत आहे का. कुणीतरी अधिकारी निलंबित होतील. पण लाठीमाराचा आदेश देणाऱ्या जनरल डायरचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाnagpurनागपूर