शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला संविधान बदलायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: September 22, 2023 15:33 IST

नागपूरमार्गे छिंदवाड्यासाठी रवाना

नागपूर : देशाचे संविधान प्रत्येकाला न्याय व अधिकार देणारे आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे. हे आपल्याला बदलू द्यायचे नाही. ही लढाई फार मोठी आहे. देशात परिवर्तन घडविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत, असे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मध्यप्रदेशात छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आदित्य ठाकरे हे शुक्रवारी सकाळी नागपूरमार्गे रवाना झाले. यावेळी सावनेर येथे बाजार समिती यार्डमध्येे आयोजित बैठकीला त्यांनी संबोधित केले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, इंडिया, भारत, हिंदुस्थान ही नावे वेगवेगळी असली तरी आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत. या देशाची लोकशाही टीकवायची आहे. पण आज देशात लोकशाही उरलेली नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात दीड वर्षांपासून घटनाबाह्य सरकार बसले आहे. होर्डींग, बॅनर व प्रसिद्धीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. पण दुसरीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचलेली नाही. वारकरी, महिला, मराठा समाजावर लाठीचार होत आहे. गणपतीच्या मिरवणुकीत एका आमदाराने फायरिंग केली. पण कारवाई झाली नाही, असा कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अध्यक्षांची भूमिका न्याय देणारी असावी

- ४० आमदारांचे सदस्यत्व रद्द होणे आवश्यक आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे न्याय देणारी असली पाहिजे, असे आदित्य ठाकरे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मध्यप्रदेशात शिवसेना निवडणुका लढविणार का, या प्रश्नावर याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे हे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहे. पण सरकारकडून काही होत आहे का. कुणीतरी अधिकारी निलंबित होतील. पण लाठीमाराचा आदेश देणाऱ्या जनरल डायरचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपाnagpurनागपूर