शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

महिला सुरक्षेसाठी विशेष अधिवेशन का बोलविले नाही ? चित्रा वाघ यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 18:37 IST

जर महाविकास आघाडी शासनाला महिला सुरक्षेची काळजी आहे तर मग विशेष अधिवेशन का बोलविले नाही, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंगळवारी त्या पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या.

ठळक मुद्देआशा वर्कर्सच्या भरवशावर मुख्यमंत्र्यांना पुरस्कार मिळाला

नागपूर : राज्य शासनाकडून महिला सुरक्षेचे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थिती नेमकी विपरीत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष अधिवेशनाची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी नाकारली. जर महाविकास आघाडी शासनाला महिला सुरक्षेची काळजी आहे तर मग विशेष अधिवेशन का बोलविले नाही, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मंगळवारी त्या पत्रपरिषदेदरम्यान बोलत होत्या.

राज्यात गुन्हेगारांना संरक्षण आहे. मात्र महिलांना सुरक्षा नाही. संजय राठोड प्रकरणाला दोन वर्षे झाली. पण अद्यापही साधा एफआयआर दाखल झालेला नाही. औरंगाबाद येथील सेनेच्या आमदारावर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायला हवा होता. सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचं काम पोलिसांकडून होत आहे. मुख्यमंत्री हे कोरोना कालावधीत घरात होते व आशा वर्कर्स जीव धोक्यात घालून काम करत होत्या. त्यांच्या भरवशावर मुख्यमंत्र्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार मिळाला. मात्र त्याच आशा वर्कर्सला हक्काच्या मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यात महिलांचा आवाज दाबायचं काम होत आहे, असा आरोप वाघ यांनी केला.

गुलाबराव पाटीलांकडून महिलांचा अपमान

गुलाबराव पाटील राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी हेमा मालिनी यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे महिलांचा अपमान करणारे होते. परंतु त्यांनी माफी मागितली व मुख्यमंत्र्यांनी त्यांना माफदेखील केले. यातूनच सरकार महिलांच्या हक्कांबाबत किती जागरूक आहे हे दिसून येत आहे, अशी टीका वाघ यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाnagpurनागपूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेWomenमहिलाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी