शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून विदर्भवाद्यांचा अपेक्षाभंग, विषबाधितांना पैसे देऊन सरकारने झटकली जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 19:31 IST

केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती.

यवतमाळ - केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने वेगळा विदर्भ देण्याची भाषा केली होती. त्यामुळे विदर्भवाद्यांना भाजपाकडून रास्त अपेक्षा होती. परंतु, भाजपाने पूर्ण अपेक्षाभंगच नव्हेतर हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे सांगणारे देवेंद्र फडणवीस माझ्यावर विदर्भाचीही जबाबदारी आहे, असे ठासून का सांगत नाहीत, असा खणखणीत सवाल माजी महाधिवक्ता आणि विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केला. 

यवतमाळात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्याच्या आश्वासनावर जागा जिंकल्या. मात्र, आता त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर दुर्लक्ष केल्याने विदर्भाच्या चळवळीची स्थिती चिंताजनक झाल्याची खंतही अणे यांनी व्यक्त केली. स्वतंत्र राज्यासाठी हिंसक आंदोलन करण्याची गरज पडणे हे राजकीय गुन्हेगारीकरणाचे लक्षण होय. केवळ विदर्भाच्या मुद्द्यावर लढणारा कुठलाही पक्ष नसल्याने आम्ही भाजपाला सहकार्य केले होते. 

पण आता विदर्भ राज्य आघाडी २०१९ मध्ये स्वत:च्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. २०१४ मध्ये भाजपाने केवळ मोदींच्या लाटेत विदर्भ जिंकला नाही. तर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या नावाने मते मागितली म्हणून विजय मिळवता आला. मात्र आता पक्षात फक्त मोदी उरलेत. गडकरी, फडणवीस यांना पक्षात स्थान नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाच्या जागा नक्कीच कमी होणार आहेत. त्या जागा काँग्रेसलाही मिळणार नाहीत. तर विदर्भासाठी झगडणाºया पक्षालाच मिळतील, असा आशावाद अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. सुरेंद्र पारधी, निरज खांदेवाले, वासूदेव विधाते, बालाजी येरावार, अ‍ॅड. अमोल बोरखडे, अनिल जवादे, संदीप तेलंग, जितेंद्र हिंगासपुरे, अमोल कठाणे आदी उपस्थित होते.

विदर्भाच्या माणसाचे सरकारला मोल नाहीयवतमाळमध्ये कीटकनाशकातून विषबाधा झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला. याची मुख्य जबाबदारी सरकारचीच आहे. मात्र, सरकार केवळ पैसे देऊन जबाबदारी झटकत आहे. मुंबईत समुद्रात वादळ असेल तर मच्छिमारांना धोक्याचा इशारा दिला जातो. मात्र विदर्भात फवारणी करताना शेतकºयांना कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नाही आणि आताही ते देण्याबाबत सरकार तोंड उघडायला तयार नाही, असा आरोप अणे यांनी केला. मृतांच्या नातेवाईकांना मोबदला देऊन सरकार जबाबदारी झटकत आहे. या प्रकरणातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोरण म्हणून काहीही जाहीर करण्यात आले नाही. ‘रडतात साले’ म्हणणा-यांकडून शेतक-यांनी अपेक्षा तरी का करावी? सरकार संवेदनाहीन असून विदर्भाच्या माणसाचे सरकार दरबारी मोल नाही, अशीही टीका त्यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपा