शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने केवळ भूमिपुजनच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:13 IST

विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.तांबे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग सोडल्यास गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आजही कायम आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वर्षाची मदत दिली जाणार आहे. यवतमाळच्या दौऱ्यात लक्षात आले की, तिथे ५ लाख २० हजार शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. परंतु प्रशासनाकडून केवळ २ लाख शेतकऱ्यांची मदतीसाठी निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्याच्या आत्महत्या थांबणे शक्य नाही. तांबे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने शहरात ‘चलो वार्ड की और’ व ग्रामीण भागात ‘चलो गाव की और’ हे अभियान राबवित आहे. पत्रपरिषदेला प्रदेश पदाधिकारी सागर देशमुख, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान, अनुराग भोयर आदी उपस्थित होते. पाच सूत्री कार्यक्रम राबविणारतांबे म्हणाले की अभियानांतर्गत बेरोजगार युवकांना शक्तीकार्ड व शेतकऱ्यांना किसान शक्ती कार्ड बनवून देण्यात येईल. काँग्रेस सरकारमध्ये आल्यावर बेरोजगारांना रोजगार भत्ता देणे व रोजगार नोंदणी विभागाला सक्षम करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी संपुर्ण कर्जमाफी योजना राबविण्यात येईल. अभियानात राफेल खरीदीतील भ्रष्टाचार जनतेला सांगण्यात येईल. आचारसंहिता लागल्यानंतरही युवा कार्यकर्ता डोअर-टू-डोअर अभियान राबवतील.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा