शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

भाजप सरकारने केवळ भूमिपुजनच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:13 IST

विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.तांबे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग सोडल्यास गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आजही कायम आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वर्षाची मदत दिली जाणार आहे. यवतमाळच्या दौऱ्यात लक्षात आले की, तिथे ५ लाख २० हजार शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. परंतु प्रशासनाकडून केवळ २ लाख शेतकऱ्यांची मदतीसाठी निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्याच्या आत्महत्या थांबणे शक्य नाही. तांबे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने शहरात ‘चलो वार्ड की और’ व ग्रामीण भागात ‘चलो गाव की और’ हे अभियान राबवित आहे. पत्रपरिषदेला प्रदेश पदाधिकारी सागर देशमुख, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान, अनुराग भोयर आदी उपस्थित होते. पाच सूत्री कार्यक्रम राबविणारतांबे म्हणाले की अभियानांतर्गत बेरोजगार युवकांना शक्तीकार्ड व शेतकऱ्यांना किसान शक्ती कार्ड बनवून देण्यात येईल. काँग्रेस सरकारमध्ये आल्यावर बेरोजगारांना रोजगार भत्ता देणे व रोजगार नोंदणी विभागाला सक्षम करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी संपुर्ण कर्जमाफी योजना राबविण्यात येईल. अभियानात राफेल खरीदीतील भ्रष्टाचार जनतेला सांगण्यात येईल. आचारसंहिता लागल्यानंतरही युवा कार्यकर्ता डोअर-टू-डोअर अभियान राबवतील.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा