शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

भाजप सरकारने केवळ भूमिपुजनच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:13 IST

विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील बोटावर मोजण्या इतके विधानसभा क्षेत्र सोडल्यास इतर क्षेत्रातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या पाच वर्षात विदर्भात एकही उद्योग लागलेला नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. मेळघाटातील कुपोषण संपलेले नाही. सिंचन आणि रस्त्याचा विकास झाला नाही. जे प्रकल्पाची काँग्रेसच्या काळात घोषणा झाली होती. त्याच प्रकल्पाचे भूमिपुजन भाजपा सरकार करीत आहे. भाजपा सरकारने आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केवळ भूमिपुजनच केले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रपरिषेदत केला.तांबे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग सोडल्यास गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था आजही कायम आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वर्षाची मदत दिली जाणार आहे. यवतमाळच्या दौऱ्यात लक्षात आले की, तिथे ५ लाख २० हजार शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. परंतु प्रशासनाकडून केवळ २ लाख शेतकऱ्यांची मदतीसाठी निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्याच्या आत्महत्या थांबणे शक्य नाही. तांबे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने शहरात ‘चलो वार्ड की और’ व ग्रामीण भागात ‘चलो गाव की और’ हे अभियान राबवित आहे. पत्रपरिषदेला प्रदेश पदाधिकारी सागर देशमुख, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान, अनुराग भोयर आदी उपस्थित होते. पाच सूत्री कार्यक्रम राबविणारतांबे म्हणाले की अभियानांतर्गत बेरोजगार युवकांना शक्तीकार्ड व शेतकऱ्यांना किसान शक्ती कार्ड बनवून देण्यात येईल. काँग्रेस सरकारमध्ये आल्यावर बेरोजगारांना रोजगार भत्ता देणे व रोजगार नोंदणी विभागाला सक्षम करण्यात येईल. शेतकऱ्यांसाठी संपुर्ण कर्जमाफी योजना राबविण्यात येईल. अभियानात राफेल खरीदीतील भ्रष्टाचार जनतेला सांगण्यात येईल. आचारसंहिता लागल्यानंतरही युवा कार्यकर्ता डोअर-टू-डोअर अभियान राबवतील.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा