शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

भाजप सरकार लोकशाहीविरोधी : अमरजित कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:09 IST

भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ए. बी. बर्धन स्मृती दिवस जाहीर सभा

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व महाराष्ट्र स्टेट ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रेल्वे स्टेशन रोडवरील परवाना भवन येथे कॉ. ए. बी. बर्धन तृतीय स्मृती दिवस जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ भाकप नेते कॉ. मोहनदास नायडू अध्यक्षस्थानी तर, लोकमत टाइम्सचे संपादकीय सल्लागार मेघनाद बोधनकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, मोहन शर्मा, राज्य सरचिटणीस श्याम काळे, डॉ. रतिनाथ मिश्रा, बीएनजे शर्मा, शंभुदयाल गुरू आदी व्यासपीठावर उपस्थित होते.२०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर बर्धन यांनी भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. हा केवळ सत्ताबदल नसून देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे ते म्हणाले होते. पुढे चालून त्यांचा प्रत्येक शब्द खरा ठरला. आता लवकरच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या परिस्थितीत बर्धन यांनी कोणते निर्णय घेतले असते याचा विचार करून पुढील वाटचाल करावी लागणार आहे. यावेळी लोकशाही विरोधकांना थांबवणे आवश्यक झाले आहे, असे अमरजित कौर यांनी पुढे बोलताना सांगितले.बर्धन हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते कोणतेही काम सक्षमपणे करीत होते. ते प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून बोलत होते. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राहत होते. त्यामुळे त्यांना विरोधकांनीही गुरूचे स्थान दिले होते, असे नायडू यांनी सांगितले.बर्धन यांना पत्रकारितेचे आकर्षण होते. त्यांचे विचार प्रभावी होते. देशाला आज त्यांच्या विचारांची गरज आहे, असे मत बोधनकर यांनी व्यक्त केले. अन्य मान्यवरांनीही समउचित विचार व्यक्त केले. बी. एन. मौर्य यांनी संचालन केले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस