शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भाजप सरकार लोकशाहीविरोधी : अमरजित कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 23:09 IST

भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ए. बी. बर्धन स्मृती दिवस जाहीर सभा

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : भाजप सरकार लोकशाहीविरोधी असून, या देशाला वाचविण्यासाठी त्यांचे वाईट मनसुबे उधळून लावण्याची वेळ आली आहे, असे मत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या महासचिव कॉ. अमरजित कौर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन व महाराष्ट्र स्टेट ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रेल्वे स्टेशन रोडवरील परवाना भवन येथे कॉ. ए. बी. बर्धन तृतीय स्मृती दिवस जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या मुख्य वक्ता म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ भाकप नेते कॉ. मोहनदास नायडू अध्यक्षस्थानी तर, लोकमत टाइम्सचे संपादकीय सल्लागार मेघनाद बोधनकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, मोहन शर्मा, राज्य सरचिटणीस श्याम काळे, डॉ. रतिनाथ मिश्रा, बीएनजे शर्मा, शंभुदयाल गुरू आदी व्यासपीठावर उपस्थित होते.२०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर बर्धन यांनी भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. हा केवळ सत्ताबदल नसून देशातील लोकशाही धोक्यात आल्याचे ते म्हणाले होते. पुढे चालून त्यांचा प्रत्येक शब्द खरा ठरला. आता लवकरच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या परिस्थितीत बर्धन यांनी कोणते निर्णय घेतले असते याचा विचार करून पुढील वाटचाल करावी लागणार आहे. यावेळी लोकशाही विरोधकांना थांबवणे आवश्यक झाले आहे, असे अमरजित कौर यांनी पुढे बोलताना सांगितले.बर्धन हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते कोणतेही काम सक्षमपणे करीत होते. ते प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करून बोलत होते. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर राहत होते. त्यामुळे त्यांना विरोधकांनीही गुरूचे स्थान दिले होते, असे नायडू यांनी सांगितले.बर्धन यांना पत्रकारितेचे आकर्षण होते. त्यांचे विचार प्रभावी होते. देशाला आज त्यांच्या विचारांची गरज आहे, असे मत बोधनकर यांनी व्यक्त केले. अन्य मान्यवरांनीही समउचित विचार व्यक्त केले. बी. एन. मौर्य यांनी संचालन केले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस