शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, बावनकुळेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 16:51 IST

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात जनतेकरीता काहीच केले नाही. त्यामुळे त्यांना सीमाभागावरील विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळेंनी यावेळी केली 

नागपूर : सरडासुद्धा कमी वेळा रंग बदलतो. परंतु, उद्धव ठाकरे एवढ्या वेळा रंग बदलतील हे वाटलं नव्हतं, अशी खरमरीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आम्ही रेशीमबाग येथे दर्शनाकरीता जात असतो. तेव्हा समाजाच्या दीनदुबळ्यांबद्दल सेवा करण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे या स्थळाबाबत असं विधान करणं आणि इतकी खालची पातळी गाठणं याचा मी निषेध करतो, असा संताप बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केला.

शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा घेतला गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर भाष्य केलं. मिंधे गट काल मुंबई पालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवायला गेला, ही वृत्ती अतिशय घाणेरडी आहे. आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेलेत. मग उद्या ते त्यावरही कब्जा करणार का?, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनी संताप व्यक्त केला. 

सीमावादावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, आधी ठाकरे बोलतात त्यामुळे तिकडून प्रतिउत्तर मिळतं. राज्यातून सीमाभागातील जनतेला भडकावले जात आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या राज्याच्या अखंडतेकरीता न्यायालयात व सरकार म्हणून जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांबद्दल ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन करायला हवं. परंतु, कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भाग केंद्रशासित करा अशी मागणी करून ते राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात जनतेकरीता काहीच केले नाही. त्यामुळे त्यांना सीमाभागावरील विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका बावनकुळेंनी यावेळी केली. 

अजित पवारांना प्रत्युत्तर

गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात राजकीय युद्ध सुरू आहे. 'मी जर मनावर घेतलं तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल', असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर बावनकुळे यांनी पलटवार केला. मी एकच दौरा केला तर ते माझा करेकट कार्यक्रम करायला निघाले. पवार कुटुंबिांबाबात बारामतीत नाराजी आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेल,' अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पवार यांनी हा इशारा ऐकल्यापासून माझी झोपच उडालीये... मला तर आता राजकीय संन्यासच घ्यावासा वाटतोय असा खोचक टोला बावनकुळेंना लगावला. त्यावर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, शरद पवार यांच्या नावाने अजित पवार मोठे झाले आहेत. त्यांचे अस्तित्व काय? कर्तृत्व काय? त्यांनी केवळ सत्तेपासून पैसा व पैशांपासून सत्ता एवढच काय ते केलयं. अजित पवारांनी दिलेलं आव्हान आम्हाला मान्य आहे. नक्कीच त्यांचे राजकीय संन्यास घेण्याचे दिवस येतील, २०२४ मध्ये नक्कीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल. 

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना