शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सरपंचपदामध्ये भाजपची सरशी, महाविकास आघाडीचाही जाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2022 21:24 IST

Nagpur News पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसल्याने आता सरपंचासह सदस्यांवर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांनी दावे - प्रतिदावे सुरू केले आहे. असे असले तरी विदर्भातील हा ग्राऊंड रिपाेर्ट ‘लाेकमत’ने अचूकपणे वेधला आहे.

नागपूर : विदर्भातील तब्बल १४४४ ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. थेट सरपंचपदासाठी ही निवडणूक असल्याने चांगलीच रंगत आली हाेती. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजप समर्थित पॅनलचे ५०३ ठिकाणी सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले. भाजप आणि शिंदे गट युतीचे ५४६ उमेदवार निवडून आले. त्यापेक्षा महाविकास आघाडी समर्थित गटाने दाेन पावले पुढे टाकली आहेत. महाविकास आघाडी समर्थित गटाचे ६८१ सरपंच निवडून आले. त्यात काँग्रेसचे ४७८, राष्ट्रवादीचे १६८ तर ठाकरे गटाच्या ३५ सरपंचांचा समावेश आहे. पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसल्याने आता सरपंचासह सदस्यांवर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पक्षांनी दावे - प्रतिदावे सुरू केले आहे. असे असले तरी विदर्भातील हा ग्राऊंड रिपाेर्ट ‘लाेकमत’ने अचूकपणे वेधला आहे.

‘लाेकमत’च्या स्थानिक प्रतिनिधींच्या रिपाेर्टनुसार, इतर पक्ष (प्रहार, शेतकरी संघटना, गाेंडवाना गणतंत्र पक्ष, आदिवासी विद्यार्थी संघ आणि अपक्ष) असे १७२ सरपंच निवडून आले. ती माेठ्या पक्षांसाठी चपराक मानली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस समर्थित ९५, प्रहार ३०, भाजप ५४, शिवसेना (उद्धव ठाकरे) १८, स्थानिक आघाडी ४० असे बलाबल राहिले. भंडारा जिल्ह्यातील ३०५ मध्ये काँग्रेस समर्थित ११०, भाजप १०४, राष्ट्रवादी ३५, शिवसेना शिंदे गट २०, इतर ३६ यांचा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ५८ पैकी काँग्रेस २२, भाजप २०, राष्ट्रवादी १, शिवसेना २, शेतकरी संघटना ७, गोंगपा १ आणि अपक्ष ६ सरपंच निवडून आले. गडचिराेली जिल्ह्यातील २७ पैकी काँग्रेसचे ६, भाजपचे ७, राकाँचे ५, बाळासाहेबांची शिवसेना २, शिवसेना (ठाकरे) १, आदिवासी विद्यार्थी संघ ३, अपक्ष ३ निवडून आले.

गाेंदिया जिल्ह्यातील ३४८ मध्ये बाळासाहेबांची शिवसेना ३, भाजप १४३, काँग्रेस ९३, राष्ट्रवादी काँग्रेस ६७, अपक्ष १५, चाबी संघटन ३१ सरपंच विजयी झाले. नागपूर जिल्ह्यात भाजप हा माेठा पक्ष ठरला. २३६ पैकी ९८ जागांवर भाजप समर्थित उमेदवार सरपंचपदी निवडून आले. काँग्रेस ८७, राष्ट्रवादी २४, शिवसेना (ठाकरे) ३, शिवसेना (शिंदे) ६, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष सरपंच १८ विजयी झाले.

यवतमाळ जिल्ह्यात भाजप २६, काँग्रेस २४, बाळासाहेबांची शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेस १२, शिवसेना (ठाकरे) ९, अपक्ष व इतर १६ असे १०० सरपंच विजयी झाले. वर्धा जिल्ह्यातील ११३ पैकी शिवसेना (ठाकरे गट) २, शिंदे गट १, भाजप ५१, राष्ट्रवादी ४, काँग्रेस ४१ आणि १५ इतर पक्ष व अपक्ष विजयी झाले. यामध्ये ३ प्रहारच्याही सरपंचाचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक