शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

टोळ निर्मूलनासाठी पक्षी संवर्धन हा उत्तम पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:06 IST

टोळ किंवा पिकांवरील इतर कीड व त्यांची अंडी हे अनेक प्रजातीच्या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. दुर्दैवाने कीटनाशकाचा वापर किंवा शेताजवळची वृक्षवल्ली कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी पक्षी संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देनवजात टोळ, अंडी हे पक्ष्यांचे खाद्य

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींच्या संख्येने आलेल्या टोळाच्या आक्रमणामुळे देशातील लाखो शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हजारो हेक्टर जमिनीवरील पीक क्षणात फस्त करण्याची व हिरवाई नष्ट करण्याची क्षमता असलेल्या टोळ किड्यांवर नियंत्रण मिळविले नाही तर मोठे संकट येऊ शकते. हे टोळ किंवा पिकांवरील इतर कीड व त्यांची अंडी हे अनेक प्रजातीच्या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. दुर्दैवाने कीटनाशकाचा वापर किंवा शेताजवळची वृक्षवल्ली कमी झाल्याने पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी पक्षी संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.अनेक पक्षी अभ्यासकांनी पक्ष्यांचा अभ्यास करून हे अनेक प्रजातींचे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र कसे आहेत, हे सिद्ध केले. पक्षी अभ्यासक नितीन मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष्यांच्या अन्नात फार मोठ्या प्रमाणात कीटकांचा भरणा असतो. शाकाहारी असणारे अनेक पक्षी मांसाहारीसुद्धा असतात. अनेक प्रजातींचे पक्षी त्यांच्या उड्डाणमार्गात माणसांच्या अन्नावर डल्ला मारणाºया या टोळाचा नाश करतात. तसेच शेत खणून त्यातील हजारो, लाखो अंडी आणि स्थित्यंतराच्या काळात असलेल्या टोळांचा फडशा पडतात. पांढरा करकोचा हा असाच टोळसंहारक पक्षी आहे. भोरडी व त्याचे पिल्ले मध्य आशियात या टोळांवर जगतात. आपल्या जवळच्या चिमण्या आणि मैना हे पक्षी देखील दाणे खण्यासह मांसाहारी असून दिवसाला टोळांची लाखो अंडी आणि टोळीचा नायनाट करू शकतात. इंडियन रॉबिन हा पक्षीदेखील टोळ किड्यांचे सुरवंट नष्ट करतो. दुर्दैवाने आज या पक्ष्यांची संख्याच कमी झाली आहे. शेतात कीटनाशकांच्या फवारनीने पक्षी देखील मृत्युमुखी पडत आहेत. शिवाय शेताच्या आसपासची झाडे कमी झाल्याने पक्ष्यांचा अधिवास नाहिसा झाला आणि ते दिसेनासे झाले आहेत. टोळधाडीमुळे पुन्हा एकदा पक्ष्यांच्या संवर्धनावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.पक्षी अनेक खेपा करून खातात किडेमैनेची एक जोडी २४ तासात ३७० व त्यापेक्षा जास्त खेपा करून टोळ, गवती टोळ व इतर किडे आपल्या घरट्यात नेते व पिल्लांना खाऊ घालते. एका खेपेत १५-२० टोळ घेऊन जाण्याची क्षमता तिच्यात असते. चिमण्या २२० ते २६० खेपा करून मऊ शरीराचे किडे किंवा टोळ किड्यांचे सुरवंट दररोज आणतात. जर्मनीतील वलगुणी पक्ष्याची एक जोडी व तिची पिल्ले दरवर्षी १२० दशलक्ष कीटक, अंडी किंवा १.५० लाख सुरवंट आणि कोष यांचा नाश करतात. काही पक्षी शेत खणून टोळ किड्यांची लाखो अंडी व सुरवंट फस्त करतात.टोळमध्ये पृथ्वीची हिरवळ नष्ट करण्याची क्षमताटोळ मादी आपली अंडी जमिनीत छोट्या डबीत घालते. कॅप्सूलवजा कवचाच्या एका डबीत मादीची १०० अंडी असतात. दक्षिण आफ्रिकेत एका ठिकाणी १३३५ हेक्टरच्या शेतात टोळांची १४ टन अंडी एकदा उत्खननात आढळल्याची माहिती आहे. या अंड्यातून १२५० दशलक्ष टोळ जन्माला आले. या प्राण्यांची धाड पडली तर जमिनीच्या एखाद्या हिरव्यागार पट्ट्याचे पडीक जमिनीत रूपांतर होऊ शकते. यावर नियंत्रण केले नाही तर पृथ्वीची हिरवाई नष्ट करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या टोळीने वारंवार स्वत:मध्ये बदल केला असून ते अधिक सक्षम झाले असून कीटकनाशकांचाही त्यांच्यावर परिणाम होत नसल्याची शक्यता मराठे यांनी नोंदवली.

 

टॅग्स :agricultureशेती