शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य : बिहारी चंद्रावरदेखील काम करू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 9:00 PM

बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देबिहारी नसतील तर देशातील कारखाने बंद होतील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारचे नागरिक अतिशय मेहनती असतात व ते कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतात. अगदी चंद्रावरदेखील नोकऱ्या निघाल्या तर ते तेथेदेखील जाऊ शकतात. देशात जर बिहारी नसतील तर कारखाने बंद होतील, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले. लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्यासाठी भाजपातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भाजपाच्या मन की बात’ या मोहिमेअंतर्गत ते नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेत जर कुणी राज्याबाहेर जात असेल तर तो चिंतेचा विषय आहे. मात्र जास्त पैसे कमविण्यासाठी बाहेर जाण्यात काहीही वावगे नाही. प्रत्येकाला तो अधिकार आहे. गुजरात, पंजाबसारख्या राज्यातील लोकदेखील रोजगारासाठी अमेरिका व कॅनडाला जातात. बिहारमध्ये महाराष्ट्रातीलदेखील अनेक लोक आहेत. अशा स्थितीत बिहारींच्या बाहेर काम करण्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेदेखील मराठी जनता बिहारींच्या विरोधात नाही. राजकारणातूनच विरोधाचे प्रकार घडतात, असे सुशील कुमार मोदी म्हणाले. बिहारचा विकासदर देशात सर्वात जास्त असून रोजगारदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बिहारमधून मजूर का येत नाही, असे इतर राज्यांतील मुख्यमंत्री फोन करून विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.राफेल प्रकरणात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरदेखील चुकीचे संदर्भ देऊन आरोप करत आहेत. हा न्यायालयाचा अपमानच आहे. कॉंग्रेसकडे खरोखरच काही तथ्य असतील तर त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी होती. त्यांनी तसे का केले नाही, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.शत्रुघ्न हे गर्दी खेचायला प्रियंका चोप्रा नाहीतयावेळी त्यांनी भाजपाचे असंतुष्ट खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. शत्रुघ्न यांना असे वाटते की आजही त्यांचा ‘जलवा’ कायम आहे. मात्र उभे राहिल्यावर लगेच गर्दी खेचायला ते काही प्रियंका चोप्रा नाहीत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१० मध्ये विधानसभा निवडणुकांत भाजपाचा प्रचार केला नव्हता. मात्र तेव्हा भाजपाला बिहारमध्ये दणदणीत विजय मिळाला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी पाटणातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच मोदी यांनी दिले.पक्ष आपलेच जाहीरनामे गंभीरतेने घेत नाहीनिवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून आश्वासने देणारे जाहीरनामे मांडण्यात येतात. मात्र जनता व राजकीय पक्ष या जाहीरनाम्यांना निवडणुकांनंतर गंभीरतेने घेत नाहीत, असा दावा सुशील कुमार मोदी यांनी केला. भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी संकल्पपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून १० कोटी नागरिकांशी यासाठी थेट संपर्क साधण्यात येणार आहेत. तसेच देशात ३०० ‘ई’ रथ तयार करण्यात आले असून ते ४० दिवस फिरतील, असे त्यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Biharबिहारministerमंत्री