शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर नगर पंचायतीचा कारभार चालतो १२ बाय १५ च्या खोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 10:59 IST

सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या भिवापूरकरांची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणाऱ्या नगर पंचायतचा संपूर्ण कारभार केवळ १२ बाय १५ च्या छोट्याशा खोलीतून चालतोय.

ठळक मुद्देसोयीसुविधांचा बोजवारामनुष्यबळाअभावी कामेही कासवगतीनेच

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या भिवापूरकरांची सर्वस्वी जबाबदारी सांभाळणाऱ्या नगर पंचायतचा संपूर्ण कारभार केवळ १२ बाय १५ च्या छोट्याशा खोलीतून चालतोय. हे ऐकून बुचकळ्यात पडू नका. कारण हे सत्य आहे. एकीकडे गावखेड्यातील ग्रामपंचायत कार्यालयदेखील सुसज्ज आहेत. परंतु भिवापूर नगर पंचायत मात्र प्रशस्त इमारतीपासून आजही वंचित आहे. एकावेळी खूप तर तीन टेबलवर तीन कर्मचारी बसू शकतील आणि दोन नागरिक उभे राहतील, मध्येच एखादे नगरसेवक वा अन्य कुणी आलेच तर आतील व्यक्ती बाहेर पडल्याशिवाय त्यांना आत प्रवेश नाही, असे चित्र नगर पंचायत कार्यालयात हमखास दृष्टीस पडते. अपुरी जागा आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे सोयीसुविधांचाही येथे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे हे चित्र पालटणार केव्हा, हा प्रश्न आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तत्कालीन ग्रामपंचायतचा उल्लेख व्हायचा. गळती लागलेल्या इमारतीतून कारभार चालत असल्याच्या समस्येला ‘लोकमत’ने त्यावेळी वाचा फोडली. लोकमतच्या वृत्तानंतर भिवापूर ग्रामपंचायतला नवीन इमारत निधी मंजूर झाला आणि दुसरीकडे भिवापूर ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यासंदर्भात घोषणाही झाली.आता फावणार नाही, याची चाहूल लागताच तत्कालीन ग्रामपंचायतने कुठलाही विचार न करता, आहे त्याच अपुऱ्या जागेत नियोजनशून्य इमारतीचे बांधकाम सुरू केले. ‘तात्काळ इमारत बांधा, पैसे वाचवा अन् खिसे गरम करा’ असाच काहीसा एककलमी उपक्रम त्या निधीतून झाला.दरम्यान, नव्या इमारतीतून नगरपंचायतचा कारभार सुरू झाला. या इमारतीत चार नगरसेवक बसतील अशा प्रकारचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षाचे केबिन, विविध प्रमाणपत्र देण्यासाठी एक खोली देण्यात आली. त्यात फक्त दोनच कर्मचारी बसू शकतात अशी व्यवस्था. सभागृह उपाध्यक्ष, विरोधी पक्षा नेता, तीन सभापतींसाठी ग्रामपंचायतच्या गळती लागलेल्या जुन्या इमारतीमध्ये व्यवस्था करण्यात आली.या अपुऱ्या जागेमुळे नगर पंचायत कर्मचाऱ्यांनाही एकदा खुर्चीवर बसले की, ‘हलता-डोलता’ येत नाही. दुसरीकडे या विभागातून आधीच्या दोन व्यक्ती बाहेर पडल्या शिवाय तिसऱ्या व्यक्तीला आत जाण्याचा पर्याय नाही. त्यामुळेच या २५ हजार लोकसंख्येचा कारभार १२ बाय १५ च्या खोलीतून चालतोय, हे हास्यास्पद असले तरी मात्र सत्य आहे.आम्हीही माणूसच..शहरातील कर आकारणी आणि कर वसुली ही दोन्ही कामे कर विभागाला करावी लागतात. एक हजार मालमत्तेमागे एक कर्मचारी याप्रकारे नगर पंचायतमध्ये पाच कर्मचारी आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र एकमेव कर्मचारी येथे कार्यरत आहे. लेखा विभागातदेखील तीन कर्मचारी गरजेचे असताना येथेही एकच कर्मचारी आहे. आस्थापना विभागात किमान चार कर्मचाऱ्यांची गरज असताना तेथेही एक कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे कामे वेळेत होत नाही. अनेकदा नगरसेवकांसह नागरिकांच्या रोषाला या अपुऱ्या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. वेळप्रसंगी नोकरीवरून काढण्याच्या धमक्या मिळतात. त्यामुळे आम्हीही माणूसचं आहोत, ‘मशीन’ नव्हे. एक कर्मचारी किती काम करणार, त्यालाही मर्यादा आहेत, अशी कैफियत कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

खोली एक; विभाग तीननगर पंचायतमध्ये कर, लेखा आणि आस्थापना हे तीन महत्त्वपूर्ण विभाग. तिन्ही विभागांसाठी स्वतंत्र खोल्या आणि कागदपत्रे ठेवण्याची वेगवेगळी व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र भिवापूर नगरपंचायतमध्ये सदर तिन्ही विभाग एकाच १२ बाय १५ च्या खोलीत आहेत. एकदा कर्मचारी खुर्चीवर आसनस्थ झाला की, परत बाहेर पडणे कठीणच. त्यातही कागदपत्रे ठेवण्यासाठी या प्रत्येक विभागाने स्वतंत्र व्यवस्था करतो म्हटले, तर कर्मचाऱ्यांना स्वत:च्या खुर्च्या बाहेर काढूनच व्यवस्था उभी करता येऊ शकते. कोट्यवधीच्या निधीतून ग्राम विकासाचे ध्येय जोपासणारी भिवापूर नगर पंचायत स्वत:च्या बाबतीत इतकी उदासीन का, असा सवालही जनमानसात विचारला जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार