शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नागपुरात भीमा कोरेगावचे पडसाद : बसवर दगडफेक , ठिकठिकाणी टायरची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:56 IST

भीमा कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यास गेलेल्या भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले.

ठळक मुद्देनिषेध, घोषणाबाजी, रस्ता रोको, इंदोऱ्यात दगडफेक

 ऑनलाईन लोकमतनागपूर : भीमा कोरेगावमध्ये शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यास गेलेल्या भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने विविध भागात पुतळा दहन केले, टायर जाळले आणि बसची तोडफोड करतानाच रस्ताही अडवून धरला. संविधान चौकापासून उत्तर नागपुरातील विविध भागात दुपारपासून प्रचंड तणाव निर्माण होत असल्याचे पाहून पोलिसांनी जोरदार बंदोबस्त लावला. राज्य राखीव दलाच्या मदतीने संतप्त जमावाला आवरत पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. दरम्यान, रात्री कामठीतही दोन बस फोडण्यात आल्या.इंदोऱ्यात रात्री दगडफेक झाली.भीमा कोरेगावमधील घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच उत्तर नागपुरातील वातावरण तापू लागले होते. भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर  राष्ट्रद्रोह तसेच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी करीत तरुण दुपारपासून विविध भागात एकत्र होऊ लागले. घोषणाबाजी सुरू झाली. दुपारी १२.३० च्या सुमारास जरीपटक्यातील भीम चौक, इंदोरा, कमाल चौकात टायर जाळून सरकारविरोधी घोषणाबाजी करीत भीमसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर मोठ्या संख्येत आंबेडकरी अनुयायी संविधान चौकात गोळा झाले. त्यांनी घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदवत रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला. काहींनी येथेही टायर जाळले. तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांचा प्रचंड ताफा घटनास्थळी पोहचला. राखीव दलाच्या तुकड्यांही बोलवून घेण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांची समजूत काढून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याची विनंती केली.जिल्हा प्रशासन व राजकीय नेत्यांचे शांततेचे आवाहनभीमा कोरेगाव येथील घटनेवर सर्व तीव्र नाराजी व निषेध व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भीमसैनिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, समाजात विविध अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांमुळे समाजात तेढ निर्माण होईल, अशा कृत्यांना नागरिकांनी बळी पडू नये व शांतता राखावी. समाज माध्यमावर विविध प्रकारच्या अफवा पसरविण्यात येतात. त्यांच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे. राष्ट्रीय   अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी हल्ल्याचा निषेध केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. यादरम्यान भीमसैनिकांनी संयम पाळावा असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. प्रकाश गजभिये आदींनी शांततेचे आवाहन केले आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस आयुक्तदेशाचे हृदयस्थळ असलेले नागपूर शहर सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानले जाते. जातीयवादाला येथे थारा नाही. त्यामुळे भीमा कोरेगावच्या घटनेच्या संबंधाने जे काही आंदोलन करायचे, ते शांततेने करावे. नागरिकांनी शांतता बाळगून आपल्या नागपुरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील सर्व सीसीटीव्ही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक वातावरण बिघडविण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी लोकमतशी बोलताना केले.संघाने केला भीमा कोरेगाव हिंसाचाराचा निषेधभीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे . या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी संघाने केली आहे.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रक जारी करून संघाची भूमिका स्पष्ट केली आहे . कोरेगाव हिंसाचार हा निषेधार्ह आणि दु:खद आहे . या घटनेचा आम्ही निषेध करतो . जे यात दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे . समाजात तेढ निर्माण करण्याचा काही छुप्या शक्ती प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांच्या जाळ्यात लोकांनी अडकू नये. नागरिकांनी समाजात शांतता व एकता कायम ठेवावी, असे आवाहन संघातर्फे डॉ. वैद्य यांनी केले .

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा