शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

भाई राखी ‘इंडियन’ है क्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 21:33 IST

बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे.

ठळक मुद्देमहिलांची खरेदीवेळी दुकानदारांना विचारणा : चीनविरुद्ध संताप, राख्या २० टक्के महाग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण. हा सण सोमवार, ३ ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सक्करदरा, सीताबर्डी बाजारासह शहराच्या विविध भागात राख्यांची दुकाने सजली आहे. तरुणी आणि महिला खरेदी करीत असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. ‘भाई राखी इंडियन है क्या’ असा पहिला प्रश्न महिला दुकानात पाय ठेवताच विचारत आहेत. भारतीयांमध्ये चीनविरुद्ध असलेला संताप यातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.राख्यांमध्ये ‘मेड इन इंडिया’चा बोलबालायावर्षी कोरोनामुळे राखी बाजारावर परिणाम झाला आहे. दरवर्षी एक महिन्यापूर्वीच राख्यांची बाजारपेठ सजत होती. पण यावर्षी १५ दिवसापूर्वी बाजारात राख्यांची दुकाने पाहायला मिळत आहे. चिनी राख्यांच्या किमतीच्या तुलनेत यावर्षी भारतीय राख्या २० टक्के महाग झाल्या आहेत. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत किंमत आहे. प्रत्येक राखीची कलाकुसर आकर्षक असल्याने प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे. मुलांसाठी कार्टुन कॅरेक्टरच्या अनेक राख्या उपलब्ध आहेत. यात डोरेमॅन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्या आहेत. याशिवाय रेशीम धागे व चंदन राख्या, आर्टिफिशियल डायमंड राख्यांसह अनेक रंग आणि डिझाईनमध्ये राख्यांचे असंख्य प्रकार बाजारात दिसून येत आहेत. कोरोनामुळे तरुणी आणि महिला खरेदीसाठी कमी संख्येने घराबाहेर येत असल्या तरीही सणाच्या दोन वा तीन दिवसाआधी खरेदीला उत्साह राहील, असे इतवारी, शहीद चौकातील विकास जैन या विक्रेत्याने सांगितले.बाजारात जुन्या चिनी राख्यांची विक्रीव्यापारी राजू माखिजा म्हणाले, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्या वर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे, ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाऱ्यांनी बोलविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी आहे. सध्या २५ टक्केही व्यवसाय झाला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.५ कोटींचा व्यवसाय यंदा २ कोटीवर!नागपुरातून संपूर्ण विदर्भात राख्यांची विक्री होते. ठोक व्यवसाय एक महिन्यापूर्वीच सुरू होतो. पण यावर्षी कोरोनाचे संकट पाहता व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात राख्यांची खरेदी केली नाही. ऑड-इव्हनमुळे किरकोळ दुकानदारांनीही माल पडून राहण्याऐवजी हव्या तेवढ्याच राख्यांची खरेदी केली. याशिवाय गावखेड्यांमध्येही बाजार भरविण्यावर बंदी आहे. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनीही यावर्षी खरेदी थांबविली आहे. शहरातील आणि तालुका स्तरावरील फेरीवाल्यांनीही थोड्याच मालाची खरेदी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे गेल्यावर्षी जवळपास ५ कोटींच्या तुलनेत यंदा २ कोटींच्या व्यवसाय होण्याची शक्यता आहे. महिला दोन-चार दिवसापूर्वी राख्यांची खरेदी करतील, असे राजू माखिजा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :RakhiराखीIndiaभारत