शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

भागवत संचालित मोदी सरकारने हिंसेचा मार्ग निवडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 7:46 PM

शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या निर्देशानुसार चालणाऱ्या मोदी सरकारने हिंसेचा मार्ग निवडला आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी मंगळवारी नागपुरात केली.

ठळक मुद्देप्रियंका गांधी लढा देणारमोहन प्रकाश यांची टीका

नागपूर : देशातील शेतकरी गेल्या वर्षभरापासून अहिंसक मार्गाने आंदोलन करीत आहेत. जुलमी तीनही कृषी कायदे रद्द करण्यासाठी लढा देत आहेत. आता हे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या निर्देशानुसार चालणाऱ्या मोदी सरकारने हिंसेचा मार्ग निवडला आहे, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते मोहन प्रकाश यांनी मंगळवारी नागपुरात केली. (The Bhagwat-led Modi government resorted to violence, Mohan Prakash)

मोहन प्रकाश म्हणाले, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमकी देतात. केंद्रीय गृहराज्यमत्री दोन मिनिटांत ठीकठाक करू म्हणतात. आता तर मंत्र्यांचा मुलगा शेतकऱ्यांना गाडीने चिरडत आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासोबत योगी सरकारच्या पोलिसांनी गैरवर्तणूक केली. खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यावर हल्ला करण्यात आला. शाह व तानाशाह मिळून या देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भागवत राष्ट्रवादी, मग ऑर्डिनन्स फॅक्टरींचे खासगीकरण का?

- मोहन भागवत हे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवतात. मग देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करणाऱ्या ऑर्डिनन्स फॅक्टरींचे खासगीकरण का करण्यात आले? त्यांच्यावरील अशोकचक्र का उतरविण्यात आले? असा थेट सवाल त्यांनी भागवत यांना केला. देशातील सैन्याला दारूगोळ्यासाठी आपण भविष्यात विदेशांवर अवलंबून रहावे लागेल, असा धोकाही त्यांनी वर्तविला.

 

अदानींच्या लुटीमध्ये मोदी सरकारचा हिस्सा

- देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाद्यतेलांचे दर दीडपट वाढले आहेत. साधारणत: महागाई वाढली तर महिना-दोन महिन्यांत ती खाली येते. मात्र, येथे तसे होताना दिसत नाही. त्यामुळे ही खरी महागाई नसून अदानीच्या लुटीमध्ये मोदी सरकारचा हिस्सा असल्याचा आरोप मोहन प्रकाश यांनी केला.

ॲमेझॉनने साडेआठ हजार कोटींची लाच दिली

- मोहन प्रकाश म्हणाले, आपण नागपुरात चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. केंद्राच्या धोरणांमुळे लहान व्यापारी धास्तावले आहेत. त्यांना संपविण्याचे काम सुरू आहे. विदेशी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने गेल्या दोन वर्षांत कायदेविषयक शुल्काच्या नावावर कायदे मंत्रालयाला ८ हजार ५४६ कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला सोयीस्कर असे नियम व कायदे बदलण्यासाठी ही रक्कम लाच म्हणून देण्यात आली, असे आता समोर आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या मुद्द्यावर मौन का धारण केले आहे, असा सवाल करीत या घोटाळ्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Mohan Prakashमोहन प्रकाश