शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सावधान, विदर्भात वाघांची शिकार वाढली; विषप्रयोगाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 07:45 IST

Nagpur News २०१८ सालापासून राज्यात २४ वाघांची शिकार करण्यात आली. यातील बहुतांश प्रकरणे ही विदर्भातीलच असून, नागपूर विभागात शिकाऱ्यांची दहशत आहे.

ठळक मुद्देराज्यात ४५ महिन्यांत २४ वाघांची शिकार

नागपूर : जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून झालेले राजकारण शांत झाले; परंतु वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आलेले नाही. २०१८ सालापासून राज्यात २४ वाघांची शिकार करण्यात आली. यातील बहुतांश प्रकरणे ही विदर्भातीलच असून, नागपूर विभागात शिकाऱ्यांची दहशत आहे. त्यातही ४६ टक्के शिकारीत वाघांना विषप्रयोग करून ठार मारण्यात आले. २०१८च्या तुलनेत २०२१ मध्ये वाघांच्या शिकारीचा आकडा वाढला असून, शिकाऱ्यांसमोर वनविभाग हतबल आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (Beware, tiger hunting has increased in Vidarbha)

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला, यातील शिकारीची प्रकरणे किती होती, आरोपींविरोधात काय कारवाई झाली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१८ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातील २४ वाघांची शिकार करण्यात आली. २०१८ मध्ये ३, २०१९ मध्ये ६, २०२० मध्ये ८ तर २०२१ मध्ये सात वाघांची शिकार झाली. सर्वाधिक १४ वाघ (५८ टक्के) नागपूर सर्कलमध्ये मारण्यात आले. १४ वाघांना विषप्रयोग करून ठार मारण्यात आले, तर विजेचा प्रवाह सोडून चार वाघांची शिकार झाली.

५७ बिबट्यांचा मृत्यू; ४५ ची शिकार

जानेवारी २०१८ पासून ४५ महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५७ बिबट्यांचा मृत्यू झाला. यापैकी ७९ टक्के बिबट्यांचा मृत्यू शिकारीतून झाला, तर १२ बिबट्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. सर्वाधिक १४ बिबट्यांचा कोल्हापूर सर्कलला मृत्यू झाला तर नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, अमरावती सर्कलमध्ये प्रत्येकी सहा बिबट शिकार किंवा शॉकमुळे मरण पावले.

 

टॅग्स :Tigerवाघ