शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

मोसमी वाऱ्यांनी दिला दगा, राज्यात कुठे कमी, तर कुठे जास्त पाऊस...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 7:09 AM

जुलै ते ऑगस्टदरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. पण मोसमी वाऱ्यांनी दगा दिला आणि पर्जन्यमानावर परिणाम झाला. परतीचा पाऊस चांगला पडण्याची अपेक्षा असली तरी येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल की काय अशी एकंदर स्थिती आहे

गोपालकृष्ण मांडवकर 

नागपूर : पावसाच्या असमतोलाने यंदा गणित बिघडवले आहे. सप्टेंबर उजाडला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने सरासरीही गाठलेली नाही. अनेक मध्यम आणि छोट्या धरणांचे काठ रिकामे आहेत. लघु प्रकल्पांत तर जेमतेम १८ टक्केच पाणी आहे. 

जुलै ते ऑगस्टदरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. पण मोसमी वाऱ्यांनी दगा दिला आणि पर्जन्यमानावर परिणाम झाला. परतीचा पाऊस चांगला पडण्याची अपेक्षा असली तरी येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल की काय अशी एकंदर स्थिती आहे. राज्यात आतापर्यंत कोकणात १२ टक्के, मध्य महाराष्ट्रात ९ टक्के, मराठवाड्यात १९ टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. विदर्भात मात्र १४ टक्के पाऊस कमी आहे.

सरासरीपेक्षा अधिक पाऊसवाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई उपनगर, चंद्रपूर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली.सरासरीपेक्षा कमी पाऊसबुलडाणा, अकोला, अमरावती, ठाणे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदूरबार, पुणे, मुंबई शहर.सरासरीइतका पाऊस : रायगड, पालघर.

असमतोल पावसाची कारणे काय?

n यंदा मान्सून विलंबाने आला.n मोसमी वाऱ्यांची दिशा वारंवार बदलत राहिली.n बंगालच्या खाडीत अपेक्षित दबाव निर्माण झाला नाही.n इंडियन ओशन ड्रायकोल्ड निगेटिव्ह असल्याने कमी पाऊस.n समुद्राकडून येणारे मोसमी वारे यंदा अनुकूल नाहीत.

या महिन्यात चांगला पाऊसयंदा अंदाज चुकले. मान्सून ब्रेक झाला. बंगालच्या खाडीत महिन्यात किमान ४ वेळा निर्माण होणारा दबाव २ वेळा तयार झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड अद्याप निगेटिव्हच आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील.     - दामोदर पायी, प्रमुख,     क्लायमेट रिसर्च अँड सर्विसेस, आयएमडी, पुणे

जमिनीचे तापमान अनिश्चित झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर निर्माण व्हायला हवे. ते बदलत असल्याने आर्द्रता तयार होत नाही. शहरीकरण, निर्वनिकरण, प्रदुषण वाढीमुळे भिन्न तापमानाचे क्षेत्र तयार झाले.     - सुरेश चोपणे,     पर्यावरण अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र