शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना धरतात वेठीस : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:30 IST

गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार रोज घडतो. विशेष म्हणजे, कामाचा जाब विचाराला जात नसल्याने लाभार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे रुग्णांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार रोज घडतो. विशेष म्हणजे, कामाचा जाब विचाराला जात नसल्याने लाभार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या १२ क्रमांकाच्या खोलीत योजनेचे कार्यालय आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी आरोग्यमित्र दिले आहेत. परंतु येथे रुग्णाच्या नातेवाईकांनाच योजनेची मंजुरी मिळण्यापासून ते रुग्णालयातून सुटी घेण्यासाठीचे सर्व सोपस्कार स्वत:लाच करावे लागतात. येथील आरोग्यमित्र केवळ नावालच आहे. सर्व कामे रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांकडून करून घेतात. स्वत: अधिकाऱ्यांसारखे वागतात. रुग्णालय प्रशासनाने या योजनेचे काम सुरळीत चालावे म्हणून दोन वैद्यकीय अधिकारी व दोन ‘डाटा प्रोसेसर’ दिले. परंतु त्यांच्या कामाला घेऊनही अनेक तक्रारी आहेत. वैद्यकीय अधिकारी वरिष्ठांना न सांगताच सुटी घेतात. सोमवारी सकाळी १०.३० वाजले तरी वैद्यकीय अधिकारी आलेले नव्हते. ‘सीव्हीटीएस’ विभागात सोमवारी एका महिलेवर तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. महिला रुग्ण योजनेतील लाभार्थी आहे. यामुळे नातेवाईक सकाळी ६ वाजेपासून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १२ क्रमांकाच्या खोलीच्या खिडकीवर उभे होते. परंतु १०.३० वाजता ‘डाटा प्रोसेसर’ने आज घेण्यात येणाऱ्या रुग्णांची यादी तयार झाली असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. उल्लेखनीय म्हणजे, अशा केसेस ‘इमरजन्सी टेलिफोनिक इन्टिमेशन’ (ईआयटी) अंतर्गत मोडतात. ७२ तासांत योजनेची मंजुरी मिळणे आवश्यक असते. परंतु जाब विचारणारे कुणीच नसल्याने मनमानेलपणा सुरू आहे.तक्रार केली म्हणून नातेवाईकांवर ओरडले कर्मचारीयोजनेतील वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाही, जागेवर राहत नाही, डाटा प्रोसेसर यांची कामाबाबत उदासीनता, आरोग्यमित्रांचा चालढकलपणा याबाबत हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रार का केली म्हणून, रुग्णाच्या नातेवाईकांवर येथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. यामुळे नातेवाईकामध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराबाबत नातेवाईक मंगळवारी अधिष्ठात्यांना लेखी तक्रार करणार आहे.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य