शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम

By कमलेश वानखेडे | Updated: December 15, 2023 17:18 IST

आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. 

नागपूर: 30 ऑक्टोबर रोजी बीड शहरात झालेल्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल. या प्रकरणी दोषी असलेल्यांना सोडणार नाही, निश्चित कारवाई करू, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली. 

माझ्या घरासमोरच पोलीस मुख्यालय आहे. मी पोलिसांना फोन केले पण प्रतिसाद मिळाला नाही. घराच्या गेट बाहेर पोलिसांची गाडी उभी होती पण काहीच केले नाही. या घटनेचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. पण यातील आरोपी कुणाशी फोनवर बोलत होते याचा रेकॉर्ड काढला तर यातील मास्टर माईंड समोर येईल. ते सात तास पोलीस कुणाच्या म्हणण्यावर शांत होते, असा सवाल करीत या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आ. क्षीरसागर यांनी केली. 

आ. जयंत पाटील यांनी एवढा मोठा हल्ला होणार आहे हे आधी कसे कळाले नाही, पोलिसांनी हवेत गोळीबार का केला नाही,  पालकमंत्र्यांनी स्वतः मागणी करूनही एसआयटी स्थापन का केली नाही, असे सवाल केले. या सर्व घटनेचे समन्वय घडवून आणणारा पप्पू शिंदे हा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा भाचा आहे, हे जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. 

यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणी २७८ आरोपींना अटक करण्यात आली असून यातील ३० जन सराईत गुन्हेगार आहेत. बीड मधील ६१ आरोपी तर माजलगाव मधील ४० आरोपी अद्याप फरार आहेत. सिसी टीव्ही मध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला त्यांनाच अटक केली आहे. हे सर्व नियोजित होते का हे तपासून पाहिले जात आहे. यातील मास्टर माईंड शोधत आहोत व दोषिवर कारवाई करणारच, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर